शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घनकचऱ्यावर होणार १८ कोटींचा खर्च

By admin | Updated: November 16, 2015 02:13 IST

अंबरनाथ नगरपरिषदेत सध्या सुरू असलेल्या घंटागाड्या या नियमाला अनुसरून सुरू नसल्याने आणि या ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने नवा ठेकेदार नेमण्यासाठी निविदा मागविल्या आहेत

पंकज पाटील,  अंबरनाथअंबरनाथ नगरपरिषदेत सध्या सुरू असलेल्या घंटागाड्या या नियमाला अनुसरून सुरू नसल्याने आणि या ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने नवा ठेकेदार नेमण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या निविदांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांना अधिन राहून कचरा संकलित करण्यात येणार आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी पालिका वर्षाकाठी १८ कोटी ३५ लाखांचा खर्च करण्याच्या तयारीत आहे. या निविदांमध्ये प्रत्येक प्रभागात ७ सफाई कामगार ठेकेदारी पद्धतीने पुरविण्यात येणार आहेत. अंबरनाथ पालिकेत प्रथमच स्वच्छतेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेचे कचरा संकलन करण्याचे काम हे पनवेलकर या कंपनीला देण्यात आले होते. वर्षाला २ कोटी रुपये कचरा संकलनासाठी या कंपनीला अदा करण्यात येत होते. शहरातील सर्व कचरा संकलित करून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत होता. मात्र, या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे नवा ठेकेदार नेमताना घनकचरा व्यवस्थापनेच्या नियमाप्रमाणे हे काम करण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे. शहरात दररोज १०५ टन कचरा निर्माण होत आहे. पालिकेच्या ५७ प्रभागांपैकी ५६ प्रभागांत कचरा उचलण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने ७ कामगार नेमण्याची तसेच प्रत्येक प्रभागात एक गाडी कचरा संकलित करण्यासाठी देण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेतील कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याने ठेकेदारी पद्धतीने हे कामगार घेण्याची वेळ पालिकेवर आली आहे. अंबरनाथ पालिकेतील ५९४ कर्मचारी हे आता प्रभागनिहाय रस्ते स्वच्छ करणे आणि गटार स्वच्छ करण्याचे काम करणार आहेत. तर, ठेकेदारी पद्धतीने नेमलेले कामगार हे प्रभागातील कचरा संकलित करून ते घंटागाडीत टाकणार आहेत. नव्या निविदेत ज्या घंडागाड्या प्रस्तावित केल्या आहेत, त्या सर्व गाड्या नव्या असणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक घंटागाडीवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात गाडीची वेळ आणि थांबा निश्चित करणार असून नागरिकांच्या तक्रार नोंदणीकरिता टोल फ्री क्रमांक आणि कॉलसेंटर उभारण्यात येईल. कचरा संकलित झाल्यावर सुका कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याबरोबरच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १८ कोटींच्या वर खर्च अपेक्षित असून तो खर्च १४ वा वित्त आयोग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त निधीतून करण्यात येणार आहे.