शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

15566 कोटी खर्च; 2500 मृत्यू; तरी...; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरेंचा संताप

By वैभव गायकर | Updated: August 16, 2023 15:46 IST

भाषणाची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी मी भाषण करायला आलो नाही मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगत.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा ईशारा दिला.

पनवेल : 2007 साली सुरु झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाले आहेत.विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आजपर्यंत 2500 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र तरी देखील या रस्त्याचे काम अर्धवटच असुन जनतेने निवडणूक दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी दि.16 रोजी पनवेल येथे मनसेच्या निर्धार मेळाव्यात उपस्थित केला.

      भाषणाची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी मी भाषण करायला आलो नाही मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगत.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा ईशारा दिला.चांद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय ?तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचं होत महाराष्ट्रातही खड्डे दिसले असल्याची टीका  राज ठाकरे यांनी केली.2007 सालापासून कॉग्रेस नंतर कोणाकोणाचे सरकार आले मात्र या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता ? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता ? अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका मनसैनिकांनी फोडला तर भाजपने टीका केली की ; रस्ते बांधायला शिका आणि उभारायला शिका मग भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिका अशी खोचक टीका यावेळी भाजपवर ठाकरे यांनी केली.2024 पर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे मुख्यमंत्री सांगतात .मग आत्ताचे काय ? माणसे मेली त्याचे काय ? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरावस्था झालेल्या मार्गातून कोंकणवासी जातील का ? अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली.रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसा मिळणार ? तो सहा महिन्यात खराब व्हायला पाहिजे.तेव्हाच टेंडर,टक्केवारी कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठेतरी थांबायला हवे.मुंबई गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचारला तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला.लवकरात लवकर मुंबई गोवा मागमार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे.

       कोंकणातील जमिनी कोणाच्या घश्यात जात आहेत.नाणार गेल्यावर बारसू कसे काय आले ? कोंकणवासियींना थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकु नयेत असेही अवाहन यावेळी कोंकणवासीयांनाकेले .

पनवेल ते सावंत वाडी पर्यंत रस्त्यावर उतरावे लागेल मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याबाबत मनसैनिकानं पनवेल ते सावंतवाडी पर्यंत रस्त्यावर उतरावे लागेल.आपल्याला लोकांना त्रास न देता आंदोलन करायचे आहे.हे आंदोलन सरकारच्या सदैव्य लक्षात राहणारे असावे असा ईशारा देत.मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनाबाबत मनसैनिकांनी तयार राहण्याचा सल्ला यावेळी पनवेल येथील निर्धार मेळाव्यात दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpanvelपनवेलMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना