शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय 

By नामदेव मोरे | Updated: May 1, 2024 18:59 IST

तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे.

नवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या तीन रुग्णालयांत १५ बेड आरक्षित केले असून, तेथे वातानुकूलित यंत्रणा बसविली आहे. याशिवाय सर्व २४ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपचाराची सोय केली आहे. नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमान ३५ अंशांवर आले असले, तरी वातावरणातील उकाडा कायम आहे. पुढील एक महिना तापमान वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

उष्माघातामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला, तर उपचारासाठी प्रत्येक विभागात सुविधा करण्याचे सुचित केले आहे. आरोग्य विभागाने ऐरोली, वाशी व नेरूळ या तीन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड आरक्षित केले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार केलेल्या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. उपचारासाठी आवश्यक सर्व उपकरणे व तज्ज्ञ मनुष्यबळाचीही सोय केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची दिघा ते दिवाळेदरम्यान २४ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्येही उष्माघाताच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत. उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. ऐरोली, वाशी व नेरूळ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. नागरी आरोग्य केंद्रामध्येही प्राथमिक उपचारांची सोय केली आहे. - डॉ. प्रशांत जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

  • पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली, तरी अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
  • घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
  • दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. अशक्तपणा, डोकुदुखी, सतत घाम येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
  • गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • तापमान जास्त असताना शारीरिक श्रमाची कामे टाळावी, जास्तीत जास्त कामे सकाळी व सायंकाळी करावी.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल