शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय 

By नामदेव मोरे | Updated: May 1, 2024 18:59 IST

तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे.

नवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या तीन रुग्णालयांत १५ बेड आरक्षित केले असून, तेथे वातानुकूलित यंत्रणा बसविली आहे. याशिवाय सर्व २४ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपचाराची सोय केली आहे. नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमान ३५ अंशांवर आले असले, तरी वातावरणातील उकाडा कायम आहे. पुढील एक महिना तापमान वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

उष्माघातामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला, तर उपचारासाठी प्रत्येक विभागात सुविधा करण्याचे सुचित केले आहे. आरोग्य विभागाने ऐरोली, वाशी व नेरूळ या तीन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड आरक्षित केले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार केलेल्या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. उपचारासाठी आवश्यक सर्व उपकरणे व तज्ज्ञ मनुष्यबळाचीही सोय केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची दिघा ते दिवाळेदरम्यान २४ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्येही उष्माघाताच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत. उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. ऐरोली, वाशी व नेरूळ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. नागरी आरोग्य केंद्रामध्येही प्राथमिक उपचारांची सोय केली आहे. - डॉ. प्रशांत जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

  • पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली, तरी अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
  • घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
  • दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. अशक्तपणा, डोकुदुखी, सतत घाम येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
  • गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • तापमान जास्त असताना शारीरिक श्रमाची कामे टाळावी, जास्तीत जास्त कामे सकाळी व सायंकाळी करावी.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल