शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्र भूषण पूरस्कारासाठी ११०० बसेसची व्यवस्था; बेस्टच्या ५०० गाड्या धावणार 

By नामदेव मोरे | Updated: April 14, 2023 18:42 IST

महाराष्ट्र भूषण पूरस्कारासाठी ११०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी मुंबई: खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी १५ ते २० लाख श्री उपस्थित राहणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असून त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई व कल्याण डोंबीवली परिवहन विभागाच्या तब्बल ११०० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सेंट्रल पार्कजवळील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क मैदान खारघर सेक्टर २८, २९ व ३१ येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण होणार आहे. आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्यामुळे तो सोहळा अनुभवण्यासाठी देशभरातून श्री सदस्य उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड मधील नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असणार आहे. कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन शासन व प्रशासनाच्या माध्यमातून जय्यत तयारी केली जात आहे. खासगी वाहनांची संख्या वाढून चक्काजामची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सार्वजनीक बसेसचा जास्तीत जास्त उपयोग केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी १८ लाख ३६ हजार नागरिकांची आसनव्यवस्था तयार केली आहे. कार्यक्रमास १५ ते २० लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असून यामध्ये बस, रेल्वे व टॅक्सीतून जवळपास साडेआठ लाख नागरिक येण्याची शक्यता आहे.

बेस्ट प्रशासनाने या सोहळ्यासाठी सर्वाधीक ५०० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेनेही ३५० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या २०० व केडीएमसी च्या ५० बसेस या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त श्री सदस्य रेल्वे व बसने कार्यक्रम स्थळाकडे जातील याकडे लक्ष देण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ३५० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. बसेसचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. - योगेश कडूस्कर, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका २६ हजार १७० खासगी बसेस व कारमहाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी देशभरातून २६१७० खासगी वाहने येतील असा अंदाज आहे. यामध्ये १६७८५ बसेस व ९३८५ कारचा समावेश असणार आहे. या सर्व वाहनांसाठी तीन पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. येथून येणार श्री सदस्यकोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, उत्तर प्रदेश, जव्हार, वाडा, पालघर, डहाणू, भिवंडी, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, मध्यप्रदेश मधून श्री सदस्य कार्यक्रमासाठी येणार आहेत.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई