शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

चार वर्षात ११ लाख पर्यटकांची भेट

By admin | Updated: November 16, 2016 04:44 IST

महापालिकेच्या नेरूळमधील वंडर्स पार्कला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. चार वर्षांमध्ये १० लाख ८५ हजार पर्यटकांनी भेट

नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळमधील वंडर्स पार्कला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. चार वर्षांमध्ये १० लाख ८५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. लग्न व इतर कार्यक्रमांसाठीही हजारो नागरिक उपस्थित राहत असतात. शहरातील विरंगुळ्याचे प्रमुख केंद्र म्हणून हे उद्यान ओळखले जात असून उद्घाटनापासून प्रवेश शुल्क व हायटेक राईडच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपये महसूल संकलित झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन डिसेंबर २०१२ मध्ये झाले. पहिल्या दिवसापासून उद्यानाला भेट देण्यासाठी शहरवासीयांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. गतवर्षी उद्यानांमधील गैरसोयींमुळे पालिकेवर प्रचंड टीका झाली होती. येथील तलावामधील पाणी आटले होते. कारंजे बंद होते. ट्रॅफिक गार्डनचा काहीही उपयोग होत नव्हता. राईडचे आकर्षण संपल्याने त्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. टॉय ट्रेन हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला होता. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने येथील फुडकोर्ट सुरू केले आहे. अ‍ॅम्फी थिएटर व बाजूची मोकळी जागा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात झाली आहे. तीन नवीन राईड सुरू केल्या आहेत. यामुळे उद्यानाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. दिवाळीमध्ये उद्यानामध्ये गर्दीचा उच्चांक होऊ लागला होता. अनेक वेळा राईडची तिकीटविक्री करण्यासाठी वाढीव खिडक्या सुरू कराव्या लागल्या होत्या. उद्यान सुरू झाल्यापासून आतापर्यंत ८ लाख ५२ हजार प्रौढ नागरिक व २ लाख ३३ हजार लहान मुलांनी उद्यानास भेट दिली आहे. याशिवाय जवळपास एक हजार नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम व लग्नसमारंभांमुळे वर्षभरात जवळपास ५० ते ६० हजार नागरिक उद्यानाला भेट देत आहेत. हायटेक राईडपेक्षा लहान मुलांची टॉयट्रेनला पसंती मिळू लागली आहे. ३ लाख ४३ हजार नागरिकांनी टॉयट्रेनवरून सवारीचा आनंद घेतला आहे. उद्यानामधील गैरसोयी बऱ्यापैकी कमी झाल्या असून नवीन खेळणी व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)