शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

१० हजार शेतकऱ्यांना हवी नुकसानभरपाई

By admin | Updated: May 23, 2016 03:11 IST

खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.

आविष्कार देसाई, अलिबागखारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. हे दुष्टचक्र तोडून २६ वर्षांपासूनची सुमारे ३९० कोटी रुपयांची नुकसानीच्या भरपाईची मागणी करण्यासाठी १० हजार शेतकरी संघटित झाले आहेत. खारभूमी विभागाला एवढ्या मोठ्या रकमेची नुकसानभरपाई देताना चांगलाच घाम फुटणार असल्याचे बोलले जाते. आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. सोमवारी जिल्हाधिकारी याप्रश्नी बैठक घेणार आहेत.२ एप्रिल २०१६ रोजी पेण येथील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक श्रमिक मुक्ती दलासोबत पार पडली होती. त्यानंतर खारभूमीला जाग आली. जमेची बाजू म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कुर्डूस ते मानकुळे या खारेपाटातील नापीक जमिनीची माहिती घेण्याची सूचना खारभूमी विकास उपविभागाचे सहायक कार्यकारी अभियंता एस.पी.पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्रच त्यांनी २९ एप्रिल २०१६ रोजी कृषी विभागाला पाठवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रतिवर्षी एकरी २० क्विंटलहून अधिक भाताचे उत्पादन होत होते. तसेच त्यामाध्यमातून किमान ५२ लोकांना रोजगार मिळत होता. शेतीच्या बांधावर भाजीपाला पिकवला जात होता. १०० किलो मासे नैसर्गिकरीत्या मिळत होते. मात्र शेतीमध्ये खारेपाणी घुसून शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक कणा मोडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.संरक्षक बंधाऱ्यांची योग्य निगा व दुरुस्ती न केल्याने जमीन नापीक झाली. दरवर्षी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे खारभूमी विभागाने जमीन नापीक झाल्यापासून आजपर्यंतची नुकसानभरपाई आठ टक्के व्याजासहित देण्याची मागणी अभिमन्यू वाघ या शेतकऱ्याने खारभूमी विभागाकडे लेखी केली आहे. अर्ज दाखल करणार मेढेखार, देहनकोनी, काचळी पिटकरी, शहाबाज, कमळपाडा, धामणपाडा, सोनकोठा, हाशिवरे येथील सुमारे १० हजार शेतकरी ३००० एकर शेतीसाठी ५० हजार रु. एकरी नुकसानभरपाईसाठी अर्ज २६ मे रोजी दाखल करणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.विशेष बैठक आजखारभूमी विभागाने कृषी विभागाला सर्वेक्षण करण्याबाबत कळविले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला संबंधित विभागासह श्रमिक मुक्ती दलालाही बोलवले असल्याचे खारभूमी विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट म्हणाले.> योजनेचे नावक्षेत्र हेक्टरफणसापूर कुर्डूस खारभूमी योजना १५६कोपरी चिखली खारभूमी योजना ५२काचली पिटकरी खारभूमी योजना ३३४मेढेखार खारभूमी योजना १७६देहेनकोनी खारभूमी योजना १६९शहाबाज खारभूमी योजना४९८कमळपाडा धामणपाडा खारभूमी योजना ३५०धाकटापाडा शहापूर खारभूमी योजना ३४५मोठापाडा शहापूर (खासगी) खारभूमी योजना ४२३धेरंड खारभूमी योजना १४९सोनकोठा खारभूमी योजना२६५मानकुळे खारभूमी योजना ५००एकूण३४१७