शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्हा परिषद सदस्य देणार आमदारांना आव्हान जिल्हा नियोजन समितीचा वाद : कपात केलेला निधी परत मिळवण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 23:32 IST

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने चालू वर्षीच्या नियोजनातून जिल्हा परिषदेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. हा निधी परत मिळावा, यासह अतिरिक्त वाढीव दहा टक्के निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य एकवटले आहेत. सोमवारी होणार्‍या नियोजन समितीच्या बैठकीत समितीचे अधिकृत सदस्य असणारे जिल्हा परिषदेचे ३२ सदस्य पालकमंत्री राम शिंदे आणि आमदार यांना आव्हान देणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी सेना-भाजपाचे सदस्य आघाडीच्या सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी कपात केलेल्या निधीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने चालू वर्षीच्या नियोजनातून जिल्हा परिषदेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. हा निधी परत मिळावा, यासह अतिरिक्त वाढीव दहा टक्के निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य एकवटले आहेत. सोमवारी होणार्‍या नियोजन समितीच्या बैठकीत समितीचे अधिकृत सदस्य असणारे जिल्हा परिषदेचे ३२ सदस्य पालकमंत्री राम शिंदे आणि आमदार यांना आव्हान देणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी सेना-भाजपाचे सदस्य आघाडीच्या सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी कपात केलेल्या निधीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. शनिवारी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीतून कपात केलेल्या निधी संदर्भात जिल्हा परिषदेत बैठक झाली. सुरुवातीला कपात केलेला निधी आणि केंद्र सरकारकडे मागण्यात आलेल्या निधी संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, कृषी सभापती शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे,भाजपाच्या हर्षदा काकडे, बाजीराव गवारे, सेनेचे सदस्य दत्तात्रय सदाफुले, सभापती संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ आणि अधिकारी उपस्थित होते. गुंड यांनी जिल्हा नियोजन समितीने जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकास योजना, शाळा खोल्या, अंगणवाडीचा निधीत कपात होता काम नये, अशी भूमिका घेतली. काकडे यांनी गेल्या वर्षी टेंडर झालेल्या पाणी योजनाच्या कामांना मंजुरी द्यावी, अशी आग्रहाची मागणी केली. त्यावर नवाल यांनी केंद्र सरकारने या योजनांच्या कामाला स्थगिती दिली असल्याचे स्पष्ट केले. शेलार यांनी जनसुविधा योजनेत मंजूर निधीपेक्षा १ कोटी रुपये अधिक मिळावे, अशी मागणी केली. त्यावर गुंड यांनी जिल्ह्यात २१६ ग्रामपंचायतींना इमारती नसून त्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये निधी मिळावा, अशी मागणी केली. काकडे यांनी प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि ग्रामपंचायत इमारतीची सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट केले. या विषयावर सदस्यांनी एकत्र आले नाही तर यश येणार नाही, अशी एकीची हाक शेलार यांनी दिली. एकीकडे सरकार पाण्यावर खर्च करा, असा संदेश देत असून दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या पाणी योजनेचे १५ कोटी कपात केले. हा निधी जिल्हा परिषदेला द्या, जलयुक्तपेक्षा दर्जेदार कामे करून दाखवू, असे आवाहन शेलार यांनी यावेळी दिले. ...........