शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकचं भारतीयांना खुंल पत्र

By admin | Updated: September 11, 2016 00:20 IST

मुस्लिम असल्यानेच तसंच आमच्या समुदायावर हल्ला करण्याचा कट रचला असून त्याच उद्धेशाने मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप झाकीर नाईकने केला आहे

- ऑनलाइल लोकमत 
नवी दिल्ली, दि. 10 - वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकने भारतीयांना उद्देशून खुल पत्र लिहिलं आहे. मुस्लिम असल्यानेच तसंच आमच्या समुदायावर हल्ला करण्याचा कट रचला असून त्याच उद्धेशाने मला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप झाकीर नाईकने केला आहे. झाकीर नाईक तपास यंत्रणांच्या रडारवर असून तरुणांना दहशतवादी होण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 
 
शातंता आणि एकता भंग करण्यासाठी सरकार मला आरोपी ठरवत आहे. मला दहशतवादाची शिकवण देणारा असं का म्हटलं जात आहे ? असा सवाल झाकीर नाईकने सरकारला विचारला आहे. मला सरकार आणि प्रसारमाध्यमांकडून जाणुनबुजून टार्गेट केलं जात आहे. माझ्याविरोधात कोणताच पुरावा मिळाला नसताना सरकार माझ्याविरुद्ध अहवाल तयार करतं आणि तोच अहवाल प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्ध केला जातो असा आरोप झाकीर नाईकने केला आहे.
 
माझ्याविरोधात जाणुनबुजून कट रचला जात आहे. मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. याला भारताचा असहिष्णू चेहराच म्हणावा लागेल असं झाकीर नाईक बोलला आहे. 
 
झाकीर नाईकवर कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या तपासात 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची माहिती समोर आली होती. देशभरातून गेल्या 10 वर्षात अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांची सुरक्षा यंत्रणांनी यादी तयार केली होती. या 55 दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची कबुलीही दिली होती. 
 
झाकीर नाईकच्या ' इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' (आयआरएफ) या संस्थेकडून 'राजीव गांधी  फाऊंडेशन'ला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे वृत्त ' टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. २०११ साली 'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन'  ही देणगी देण्यात आली असून आयआरएफनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देणगी म्हणून देण्यात आलेली ही रक्कम स्वीकारली असली तरीही आयआरएफने ही रक्कम 'राजीव गांधी फाऊंडेशन'ला नव्हे तर 'राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट'ला दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.