शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

सरसंघचालकांना ‘झेड प्लस’ सुरक्षा

By admin | Updated: June 8, 2015 03:14 IST

अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांना आता २४ तास विशेष समूहाचे सुरक्षा कवच राहणार आहे.

नागपूर : अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांना आता २४ तास विशेष समूहाचे सुरक्षा कवच राहणार आहे. ‘झेड प्लस’ दर्जाची मात्र केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील ही सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलावर (सीआयएसएफ) राहणार आहे. सरसंघचालक भागवत यांच्यासह नागपुरातील संघ मुख्यालय सुद्धा अनेक अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वी संघ मुख्यालयावर प्रचंड क्षमतेची स्फोटके घेऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न देखील केला आहे. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय आणि सरसंघचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकावर (एसपीयू) आणि राज्य राखीव दलाच्या (आरपीएफ) जवानांकडे होती.

गुप्तचर यंत्रणांचा इशारा सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडून अलीकडे मिळालेल्या संकेतानुसार, भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना व्हीव्हीआयपी सुरक्षा पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला.

असे असेल सुरक्षा कवच भागवत नागपुरात संघ मुख्यालयात असो किंवा महाराष्ट्र अथवा देशभर जिथे कुठे दौऱ्यावर जातील, तेथे त्यांच्या आजूबाजूला सुमारे ६० कमांडोंचा गराडा असेल. २४ तास सरसंघचालकांच्या सुरक्षेत हे कमांडो तैनात असतील. नव्या सुरक्षेंतर्गत त्यांच्या ताफ्यातील वाहनेही बदलण्यात येतील. या विशेष सुरक्षा समूहाकडे एके ४७ / ५६ रायफल्ससारखी अत्याधुनिक हत्यारे तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असेल. ऐनवेळी उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना सुरक्षेच्या खातर हे कमांडो जागेवरच कोणताही निर्णय घेऊ शकतात.

पाचपट कडक सुरक्षासरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नागपुरातील चार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सध्या झेड प्लस सुरक्षा कवच आहे. स्थानिक एसपीयू मधील १२ सशस्त्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचे (कमांडो) पथक ही सुरक्षा व्यवस्था सांभाळतात. हे पथक राज्य सरकारच्या अखत्यारातील आहे. त्या तुलनेत तब्बल पाच पट अधिक कमांडो (सुरक्षा व्यवस्था) असणारे आणि केंद्राच्या अख्त्यारातील सुरक्षा कवच बहाल झालेले सरसंघचालक भागवत हे नागपुरातील प्रथम अतिमहत्त्वाची व्यक्ती ठरले आहेत. (प्रतिनिधी)