शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

ज्येष्ठांचा मान तरुणांनी ठेवावा : वळसे पाटील

By admin | Updated: April 30, 2016 01:37 IST

तळेघर : आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या समाजाने व मातीने आपणाला मोठं केलं, त्यांची आठवण व त्यांनी केलेले ऋण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरू नका. संसार तर सगळेच करतात. तुम्ही पण करणार आहात. पण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढील भविष्यात आनंद देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

तळेघर : आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या समाजाने व मातीने आपणाला मोठं केलं, त्यांची आठवण व त्यांनी केलेले ऋण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरू नका. संसार तर सगळेच करतात. तुम्ही पण करणार आहात. पण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढील भविष्यात आनंद देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असा सल्ला विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
तळेघर (ता. आंबेगाव) येथे श्री वरसुबाई माता आदिवासी कल्याणकारी संस्था व तळेघर ग्रामस्थ त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी वळसे पाटील बोलत होते. वधूवरांना शुभेच्छा देताना वळसे पाटील म्हणाले, की येथील सामुदायिक विवाह सोहळा हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. काळाची गरज ओळखून आदिवासी भागातील कार्यकर्ते समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. हे वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टीने अडचणीचे वर्ष आहे. आज दुष्काळी परिस्थिती आहे. एका बाजूला पाणी-पाऊस कमी झाला म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अडचणींचा सामना करावा लागला. आज पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या परिसरात निर्माण झाला आहे. आपल्या आदिवासी भागातील आदिवासी जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करा, असा सल्लाही आपल्या कार्यकर्त्यांना वळसे पाटील यांनी दिला. तळेघर येथे सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे. आपल्या भागातील आदिवासी बांधव जमीन, गाई, बैल, म्हैस विकून मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी तळेघर ग्रामस्थ व या आदिवासी कल्याणकारी संस्थेच्या वतीने या भागात पुढाकार घेऊन समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. मुलगी आई-वडिलांना बोजा वाटू नये यासाठी विवाह सोहळ्यात होणारे मानपान, आहेर, हुंडा, कपडे व पाहुणचार या अनिष्ट प्रथा बंद करून विवाहसोहळा करण्यात आला. यामध्ये आदिवासी समाजाची १० जोडपी विवाहबद्ध झाली. आपल्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात सामुदायिक सोहळे होत आहेत. माझ्या आदिवासी बांधवांचा पैसा, वेळ, धावपळ वाया न जाता सोहळा थाटात संपन्न होत आहे. समाजाने आदिवासी बांधवांचा आदर्श घ्यावा, असा उपदेशही या वेळी वळसे पाटील यांनी केला. (जोड पुढे आहे.............)