शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मोदींनी मदत देऊनही तरुणाचे प्राण गेलेच!

By admin | Updated: July 5, 2015 04:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील एका ३३ वर्षांच्या दलित तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील एका ३३ वर्षांच्या दलित तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पाच महिन्यांपूर्वी तत्परतेने आर्थिक मदत देऊनही लखनौच्या सरकारी इस्पितळात अशा शस्त्रक्रियांसाठी मोठी प्रतीक्षायादी असल्याने या तरुणाचा बुधवारी शस्त्रक्रियेअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.वाराणसीच्या रोहानिया भागात राहणाऱ्या संतोषकुमार या तरुणाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केल्यापासून लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये वेळोवेळी डायलिसिस केले जात होते. संतोषकुमारला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी ४.३७ लाख रुपये खर्च सांगितला. एवढे पैसे उभे करणे अशक्य असल्याने रिटा हिने पंतप्रधान मोदींच्या वाराणसी जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख शिवशरण पाठक यांच्याशी संपर्क साधला. त्याचा उपयोग झाला व गेल्या फेब्रुवारीत पंतप्रधान कार्यालायने संतोषकुमारवरील शस्त्रक्रियेसाठी २.१७ लाख रुपयांची रक्कम संजय गांधी इस्पितळात जमाही केली. भाजपाचे विधान परिषद सदस्य लक्ष्मण वापपेयी यांनी त्यांच्या आमदार निधीतून बाकीची रक्कम देण्याचे वचन दिले होते.संजय गांधी इस्पितळात मोठी वेटिंग लिस्ट आहे व तोपर्यंत संतोषकुमारची शस्त्रक्रिया लांबविणे इष्ट नाही हे लक्षात घेऊन, या इस्पितळाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया किंग एडवर्ड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या इस्पितळात करण्याची सूचना, संजय गांधी इस्पितळाचे संचालक प्रा. राकेश कपूर यांनी मध्यंतरी केली होती. यास दुजोरा देताना किंग एडवर्डचे कुलगुरु रविकांत यांनी सांगितले की, कपूर १ जुलै रोजी या संदर्भात माझ्याशी बोलले होते. परंतु मी त्यांना सांगितले की, आम्ही शस्त्रक्रियेसाठी फक्त आॅपरेशन थिएटर उपलब्ध करून देऊ पण पुढील उपचार नेफ्रॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली करणे गरजेचे असल्याने रुग्णाला नंतर संजय गांधीमध्ये हलवावे लागेल. त्यानंतर कपूर यांच्याकडून काही उत्तर आले नाही, असेही रविकांत म्हणाले. (वृत्तसंस्था)सामान्य माणसाच्या आजारपणाचे गांभीर्य राजकारणी व संजय गांधी इस्पितळाच्या प्रशासनाने लक्षात न घेतल्यानेच माझ्या भावाला प्राण गमवावे लागले. -रिचा, संतोषकुमारची बहीण