शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

By admin | Updated: July 27, 2016 19:17 IST

जळगाव: प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणीच्या वडीलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, इज्जतीचा प्रश्न म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देवून सोडून देण्यात आले.

जळगाव: प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणीच्या वडीलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, इज्जतीचा प्रश्न म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देवून सोडून देण्यात आले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका नामांकित शाळेत शिक्षण घेणार्‍या तरुणीजवळ गेल्या तीन दिवसापासून मोबाईल होता.तो मोबाईल बुधवारी तिच्या पालकांच्या नजरेस पडला. त्याबाबत तिला जाब विचारला असता तिने एका तरुणाचे नाव सांगितले. त्यानेच हा मोबाईल दिल्याचे सांगितले, मात्र तो मैत्रिणीसाठी दिल्याचेही तरुणीने सांगितले. मोबाईल प्रकरणामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी संबंधित तरुणाला आर.आर.शाळेजवळ गाठले. शाळा सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. मुलीला त्रास देतो या कारणावरुन तिच्या वडीलांनी त्याची येथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत तरुण घायाळ झाला. संतापात काहीही घडना घडू शकते याचा अंदाज आल्याने काही लोकांनी तरुणाला सोडविण्याचा प्रयत्न केला तर काहींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन करुन माहिती दिली. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले.
दोघांमध्ये प्रेमप्रकरणाची चर्चा
पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तो तरुण व ती तरुणी दोघांमध्ये प्रेमप्रकरण फुलल्याची माहिती काही जणांनी पोलिसांना दिली, तर पालकांनी मात्र या गोष्टीचा इन्कार केला. यापूर्वीही तरुणाला तिच्या पालकांनी समज दिली होती असे सांगण्यात आले. मात्र दोघांमध्ये प्रेमप्रकरण होते की नाही ? याबाबत अधिकृपणे कोणीही सांगायला तयार नव्हते. मुलगा बारावी नापास झालेला आहे. घरची परिस्थिती साधारणच आहे. तर मुलीची आई व वडील दोन्हीही जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. मुलीच्या वडीलांनी तक्रार दिली तर मुलगाही मारहाणीची तक्रार देण्याच्या मानसिकतेत आला होता. शिवाय चौकशीत काय निष्पन्न होईल,हे सांगता येत नाही त्यामुळे कोणीही तक्रार दिली नाही. आपसात समजोता करुन वाद मिटवण्यात आला.