शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

By admin | Updated: July 27, 2016 19:17 IST

जळगाव: प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणीच्या वडीलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, इज्जतीचा प्रश्न म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देवून सोडून देण्यात आले.

जळगाव: प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणीच्या वडीलांसह त्यांच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे बारा वाजता आर.आर.शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घडली. यावेळी पाचशे ते सातशे जणांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांनी तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले. दोघांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले, इज्जतीचा प्रश्न म्हणून दोघांनीही तक्रार दिली नाही, मात्र तरुणाला समज देवून सोडून देण्यात आले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका नामांकित शाळेत शिक्षण घेणार्‍या तरुणीजवळ गेल्या तीन दिवसापासून मोबाईल होता.तो मोबाईल बुधवारी तिच्या पालकांच्या नजरेस पडला. त्याबाबत तिला जाब विचारला असता तिने एका तरुणाचे नाव सांगितले. त्यानेच हा मोबाईल दिल्याचे सांगितले, मात्र तो मैत्रिणीसाठी दिल्याचेही तरुणीने सांगितले. मोबाईल प्रकरणामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी संबंधित तरुणाला आर.आर.शाळेजवळ गाठले. शाळा सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. मुलीला त्रास देतो या कारणावरुन तिच्या वडीलांनी त्याची येथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत तरुण घायाळ झाला. संतापात काहीही घडना घडू शकते याचा अंदाज आल्याने काही लोकांनी तरुणाला सोडविण्याचा प्रयत्न केला तर काहींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन करुन माहिती दिली. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले.
दोघांमध्ये प्रेमप्रकरणाची चर्चा
पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तो तरुण व ती तरुणी दोघांमध्ये प्रेमप्रकरण फुलल्याची माहिती काही जणांनी पोलिसांना दिली, तर पालकांनी मात्र या गोष्टीचा इन्कार केला. यापूर्वीही तरुणाला तिच्या पालकांनी समज दिली होती असे सांगण्यात आले. मात्र दोघांमध्ये प्रेमप्रकरण होते की नाही ? याबाबत अधिकृपणे कोणीही सांगायला तयार नव्हते. मुलगा बारावी नापास झालेला आहे. घरची परिस्थिती साधारणच आहे. तर मुलीची आई व वडील दोन्हीही जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. मुलीच्या वडीलांनी तक्रार दिली तर मुलगाही मारहाणीची तक्रार देण्याच्या मानसिकतेत आला होता. शिवाय चौकशीत काय निष्पन्न होईल,हे सांगता येत नाही त्यामुळे कोणीही तक्रार दिली नाही. आपसात समजोता करुन वाद मिटवण्यात आला.