शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आपण स्वत: हून भितीत जगतो

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मी जळगावात त्या मुलीच्या लग्नाला नक्की येईन?
मुली लग्न करून सासरी जातात. नंतर त्यांचे लग्न मोडल्यावर त्यांना घर नसते. बहिणाबाईंनी हे वास्तव आपल्या कवितेतून मांडले. तरी अजूनही परिवर्तन झाले नाही. मुली आपले घर बांधून नवरा आपल्या घरात केव्हा आणतील. जळगावातील एक मुलगी मला भेटली होती. तिने आपले स्वत:चे घर बांधून घरात नवरा आणायचा असे ठरविले आहे. मी तिच्या लग्नाला नक्की येईल... व तिच्या घरालाही भेट देईन. स्त्रिया धर्म, कर्मकांड, चाकोरीत अडकलेल्या दिसतात. यातून त्या केव्हा बाहेर पडणार, असा प्रश्नही मंजुळे यांनी उपस्थित केला.

प्रेम करताना विचार करू नका...
सौंदर्य दिसण्यावर नसते. ते असण्यावर असते. कुरूप म्हणजे वाईट, अशी मानसिकता आहे. पण अनेक कुरूप मुली यशस्वी, कौशल्यवान आहेत. प्रेम करा, प्रेम करण्यापासून कुणाला अडवू नका, जात पात पाहू नका... पण एकतर्फी प्रेम करू नका... अलीकडे अनेक मुली प्रेम करताना आडनाव, जात, शिक्षण हे तपासून घेतात. असे करून प्रेम होत नाही.., असेही मंजुळे गमतीने म्हणाले.

दोन वेळच्या जेवणासाठी काम
अनेकजण जे काम करतात ते आवडीने, मनापासून करतात, असे नाही. आपल्याला व्यवस्थित जगता यावे, दोन वेळचे जेवण, हा विचार असतो. श्रमाला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, असेही मंजुळे यांनी सांगितले.