शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

आपण स्वत: हून भितीत जगतो

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मी जळगावात त्या मुलीच्या लग्नाला नक्की येईन?
मुली लग्न करून सासरी जातात. नंतर त्यांचे लग्न मोडल्यावर त्यांना घर नसते. बहिणाबाईंनी हे वास्तव आपल्या कवितेतून मांडले. तरी अजूनही परिवर्तन झाले नाही. मुली आपले घर बांधून नवरा आपल्या घरात केव्हा आणतील. जळगावातील एक मुलगी मला भेटली होती. तिने आपले स्वत:चे घर बांधून घरात नवरा आणायचा असे ठरविले आहे. मी तिच्या लग्नाला नक्की येईल... व तिच्या घरालाही भेट देईन. स्त्रिया धर्म, कर्मकांड, चाकोरीत अडकलेल्या दिसतात. यातून त्या केव्हा बाहेर पडणार, असा प्रश्नही मंजुळे यांनी उपस्थित केला.

प्रेम करताना विचार करू नका...
सौंदर्य दिसण्यावर नसते. ते असण्यावर असते. कुरूप म्हणजे वाईट, अशी मानसिकता आहे. पण अनेक कुरूप मुली यशस्वी, कौशल्यवान आहेत. प्रेम करा, प्रेम करण्यापासून कुणाला अडवू नका, जात पात पाहू नका... पण एकतर्फी प्रेम करू नका... अलीकडे अनेक मुली प्रेम करताना आडनाव, जात, शिक्षण हे तपासून घेतात. असे करून प्रेम होत नाही.., असेही मंजुळे गमतीने म्हणाले.

दोन वेळच्या जेवणासाठी काम
अनेकजण जे काम करतात ते आवडीने, मनापासून करतात, असे नाही. आपल्याला व्यवस्थित जगता यावे, दोन वेळचे जेवण, हा विचार असतो. श्रमाला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, असेही मंजुळे यांनी सांगितले.