शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

आप सरकार अपयशी ठरविण्याचा डाव -केजरीवाल

By admin | Updated: May 18, 2015 02:46 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात खुले युद्ध छेडले असतानाच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी या मुद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. आमचे सरकार अपयशी ठरावे, यासाठी सर्व प्रकारचे डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या बुरांडी येथे एका सभेत केजरीवाल बोलत होते. सरकारची मनाई धुडकावून ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलीन यांनी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केजरीवाल या मुद्यावर उघडपणे समोर आले. आम्ही गामलीन यांच्या नियुक्तीला विरोध केला; मात्र आमचा विरोध डावलून गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मोदी सरकारच्या हेतूंबाबत संशय निर्माण करणारी आहे; पण मी गामलीन यांच्यावर नजर ठेवेल. आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा गामलीन एका पत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी आमच्या ऊर्जामंत्र्यांकडे आल्या होत्या. रिलायन्स मालकीच्या वीज कंपन्यांनी ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला आहे, असे त्यांनी आमच्या मंत्र्यांना सांगितले होते. संबंधित पत्रावर स्वाक्षरी करा. ही केवळ औपचारिकता आहे, असे त्या म्हणाल्या होत्या; पण जेव्हा आमच्या ऊर्जामंत्र्यांनी या पत्राची शहानिशा केली तेव्हा ते हमीपत्र निघाले. रिलायन्सच्या मालकीच्या कंपन्या कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्या असत्या तर तो भुर्दंड दिल्लीच्या जनतेवर पडला असता आणि दिल्लीतील वीजदर दुप्पट-तिप्पट महागले असते, असा दावाही केजरीवाल यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)