शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

आप सरकार अपयशी ठरविण्याचा डाव -केजरीवाल

By admin | Updated: May 18, 2015 02:46 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात खुले युद्ध छेडले असतानाच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी या मुद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. आमचे सरकार अपयशी ठरावे, यासाठी सर्व प्रकारचे डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या बुरांडी येथे एका सभेत केजरीवाल बोलत होते. सरकारची मनाई धुडकावून ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलीन यांनी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केजरीवाल या मुद्यावर उघडपणे समोर आले. आम्ही गामलीन यांच्या नियुक्तीला विरोध केला; मात्र आमचा विरोध डावलून गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मोदी सरकारच्या हेतूंबाबत संशय निर्माण करणारी आहे; पण मी गामलीन यांच्यावर नजर ठेवेल. आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा गामलीन एका पत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी आमच्या ऊर्जामंत्र्यांकडे आल्या होत्या. रिलायन्स मालकीच्या वीज कंपन्यांनी ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला आहे, असे त्यांनी आमच्या मंत्र्यांना सांगितले होते. संबंधित पत्रावर स्वाक्षरी करा. ही केवळ औपचारिकता आहे, असे त्या म्हणाल्या होत्या; पण जेव्हा आमच्या ऊर्जामंत्र्यांनी या पत्राची शहानिशा केली तेव्हा ते हमीपत्र निघाले. रिलायन्सच्या मालकीच्या कंपन्या कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्या असत्या तर तो भुर्दंड दिल्लीच्या जनतेवर पडला असता आणि दिल्लीतील वीजदर दुप्पट-तिप्पट महागले असते, असा दावाही केजरीवाल यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)