शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

‘आप’च बाप!

By admin | Updated: February 11, 2015 06:34 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या भाजपाच्या दृष्टीने हा पराभव नियतीने घेतलेला सूडच म्हणावा लागेल. एक, म्हणजे ‘काँग्रेसमुक्त दिल्ली’चे त्यांचे स्वप्न साकार झाले, पण हे कर्तृत्व त्यांच्या हातून न घडता ते ‘आप’ने करून दाखविले. दुसरे असे की, दिल्लीची सत्ता काबीज करायला निघालेल्या भाजपाला ७०पैकी केवळ ३ जागा मिळाल्याने लाज राखणेही मुश्किल झाले. तिसरे असे की, मे महिन्यापासून चौखूर उधळलेल्या मोदी लाटेच्या वारूला ‘आप’च्या ‘झाडू’ने चारी मुंड्या चीत करून फेंफरे आणले! सर्वांत झोंबणारी गोष्ट अशी की, या निवडणुकीचा ‘फोकस’ मोदींपासून दूर राहावा म्हणून भाजपाने किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरविले. पण बेदींनाही त्यांना निवडून आणता आले नाही. लोकसभा निवडणुकीत ४४ जागा मिळालेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही न देणाऱ्या भाजपाच्या वाट्याला तीच नामुश्की दिल्ली विधानसभेत आली. काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे अघोषित उमेदवार अजय माकन हेही पडझडीत टिकाव धरू शकले नाहीत. पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला.> दिल्लीत झालेल्या राजकीय भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (आप) मोदी लाटेवर स्वार होऊन मस्तवाल झालेल्या भाजपाला धूळ चारत आणि शरपंजरी पडलेल्या काँग्रेसला पूर्णपणे नामशेष करीत राजधानीची सत्ता न भूतो अशा बहुमताने पुन्हा काबीज केली. गेल्या वर्षभराच्या राजकीय अस्थिरतेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मतदारांनी ‘पाच साल, केजरीवाल’ असा ठणठणीत कौल देत सर्वांचीच बोलती बंद केली.> संपूर्ण दिल्ली आपमयआम आदमी पार्टीने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण दिल्लीत ‘पाच साल केजरीवाल’चे नारे लागत होते. सर्व ठिकाणी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जल्लोष करत होते.