शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारला 1 महिना पूर्ण, महिन्याभरात घेतले धडाकेबाज निर्णय

By admin | Updated: April 19, 2017 16:51 IST

19 मार्च रोजी योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सूत्रं हाती घेतली. आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 19 - उत्तर  प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत राज्यात आपली सत्ता स्थापन केली.  19 मार्च रोजी योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सूत्रं हाती घेतली. आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे.  मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर योगींनी बरेच धडाकेबाज निर्णय घेतले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी योगी सरकार आणि त्यांचं मंत्रिमंडळ कामाला लागले आहे. 
 
अवैध कत्तलखान्यांवरील कारवाई, रस्त्यांच्या समस्या, सरकारी कार्यालयांत गुटखा खाण्यावर बंदी यांसारखे धडाकेबाज निर्णय आदित्यनाथ यांनी घेतले. योगी यांनी सुरुवातीला अधिकारी वर्गात कोणतेही बदल न करण्याचे संकेत दिले होते. मात्र, सरकारचा एक महिना पूर्ण होण्याआधीच त्यांनी जवळपास 40 हून अधिक अधिका-यांची बदलीदेखील केली.  यात आयएएस अधिकारी नवनीत सेहगल आणि रमा रमण यांच्यासहीत 20 अधिका-यांचा समावेश होता. 
 
योगी सरकारकडून घेण्यात आलेले धडाकेबाज निर्णय
1. शेतक-यांना कर्जमाफी 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या एक लाखापर्यंतच्या कर्ज माफीची घोषणा केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे ३० हजार ७२९ कोटींचे कर्ज माफ होणार असून, बुडीत कर्ज धरून एकूण ३६ हजार ३५९ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. या कर्जमाफीचा लाभ उत्तर प्रदेशमधील ८६ लाख लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश सरकारनं ३६ हजार ३५९ कोटींची तरतूद केली आहे.
 
2. अवैध कत्तलखान्यांवर बंदी
मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती आराखडा आखण्याचा आदेश दिला. या कारवाईत शेकडो अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले. याविरोधात मांस विक्री करणा-यांनी निदर्शनंही केली.   
 
3. अॅन्टी रोमियो स्क्वॉड
महिला-तरुणींविरोधात वाढणारे अत्याचार, गुन्हे लक्षात घेऊन योगी आदित्यनाथ यांनी अॅन्टी रोमियो स्क्वॉडची स्थापना केली. महिलांसोबत होणा-या छेडछाडीच्या घटनांना चाप लावण्यासाठी या स्क्वॉडची स्थापना करण्यात आली. 
 
4. सरकारी कार्यालयांमध्ये गुटख्यावर बंदी
योगी सरकारने सत्तेत येताच सरकारी कार्यालयांमध्ये पान-गुटखा खाण्यावर बंदी घातली. सोबत प्लास्टिकच्या वापरावरही रोख आणण्यात आली.  योगी आदित्यनाथ जेव्हा सचिवालय परिसरात पोहोचले होते तेव्हा त्यांना तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसली. जागोजागी गुटखा आणि तंबाखू खाऊन केलेल्या घाणीवर त्यांनी संताप व्यक्त केला. यावर भडकलेल्या योगींनी सरकारी कार्यालयांत गुटखा खाण्यावर बंदी आणली. 
 
5. खड्डेमुक्त रस्ते
15 जूनपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.  
 
6. वीज पुरवठा
2018 पर्यंत 24 तास वीज पुरवठा करण्यात येणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली. कॅबिनेटच्या दुस-या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.