शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

होय, मुंबईवरील हल्ला पाकिस्तान्यांनीच केला - पाक तपास संस्थेच्या प्रमुखाची कबुली

By admin | Updated: August 4, 2015 14:57 IST

मुंबईवरील २६/११ चा हल्ला पाकिस्तान्यांनीच केला आणि त्याचं नियोजन पाकिस्तानमधूनच झालं असं अखेर पाकिस्तानच्याच तपास पथकाच्या माजी प्रमुखाने मान्य केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मुंबईवरील २६/११ चा हल्ला पाकिस्तान्यांनीच केला आणि त्याचं नियोजन पाकिस्तानमधूनच झालं असं अखेर पाकिस्तानच्याच तपास पथकाच्या माजी प्रमुखाने मान्य केले आहे. तारीक खोसा, जे पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचे प्रमुख होते आणि या त्यांनी मुंबईवरील हल्ल्याच्या तपासाचे कार्य केले होते. या हल्ल्यामध्ये १६६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला पाकिस्तानने तोंड द्यायला हवे आणि सत्य स्वीकारतानाच झालेल्या चुकांचीही कबुली द्यायला हवी असे स्पष्ट मत खोसा यांनी नोंदवले आहे.
सिंध प्रांतातल्या थट्टाजवळ दहशतवाद्यांचा प्रशिक्षणतळ होता आणि तिथे लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले आणि सागरी मार्गाने ते भारतात गेले, हा घटनाक्रम तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचे खोसांनी एका लेखात म्हटले आहे. मुंबईला जी स्फोटके धाडण्यात आली त्यांचे खोके या प्रशिक्षणतळावर मिळाल्याचेही ते नमूद करतात. 
अजमल कसाब हा पाकिस्तानी होता, तो कुठल्या शाळेत गेला, रहायचा कुठे आणि तो एलईटीमध्ये दाखल झाला अशा सगळ्या गोष्टीही पाकिस्तानी तपास पथकाने शोधल्याचे खोसा यांनी नमूद केले आहे. 
कसाब व त्याच्या सहका-यांनी ज्या डिंगीतून प्रवास केला ती डिंगी व तिचे इंजिन कराचीमधल्या एका दुकानातून विकत घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे. या इंजिनसाठी पैसे कुणी दिले हे शोधून पाकिस्तानने त्या व्यक्तीसही अटक केले आहे. इतकंच नाही तर या दहशतवाद्यांशी पाकिस्तानमधल्या कुठल्या ठिकाणाहून संवाद साधण्यात येत होता त्यासाठी इंटरनेटची कुठली यंत्रणा वापरली याचा छडाही पाकिस्तानी तपास संस्थेने लावल्याचे कोसा यांनी म्हटले आहे.
झकीर उर रेहमान लखवी आणि अन्य सहा जणांना अटकही झाली असून खूप दीर्घकाळ या खटल्याचे काम सुरू असून याप्रकरणी न्याय मिळण्याची खात्री पाकिस्तानने द्यायला हवी अशी सूचनाही खोसा यांनी केली आहे. 
एकमेकांवर दुगाण्या झाडण्यापेक्षा भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या कायदेतज्ज्ञांनी एकत्र बसून मार्ग काढायला हवा अशी सूचनाही खोसांनी केली आहे. या प्रकरणात अनेक आरोपी फरार असल्याचेही खोसांनी या लेखात म्हटले असून त्यांना पकडायला हवे त्याखेरीज हा खटला अंतिम परीणाम गाठू शकत नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.