शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

होय, मुंबईवरील हल्ला पाकिस्तान्यांनीच केला - पाक तपास संस्थेच्या प्रमुखाची कबुली

By admin | Updated: August 4, 2015 14:57 IST

मुंबईवरील २६/११ चा हल्ला पाकिस्तान्यांनीच केला आणि त्याचं नियोजन पाकिस्तानमधूनच झालं असं अखेर पाकिस्तानच्याच तपास पथकाच्या माजी प्रमुखाने मान्य केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मुंबईवरील २६/११ चा हल्ला पाकिस्तान्यांनीच केला आणि त्याचं नियोजन पाकिस्तानमधूनच झालं असं अखेर पाकिस्तानच्याच तपास पथकाच्या माजी प्रमुखाने मान्य केले आहे. तारीक खोसा, जे पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचे प्रमुख होते आणि या त्यांनी मुंबईवरील हल्ल्याच्या तपासाचे कार्य केले होते. या हल्ल्यामध्ये १६६ जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला पाकिस्तानने तोंड द्यायला हवे आणि सत्य स्वीकारतानाच झालेल्या चुकांचीही कबुली द्यायला हवी असे स्पष्ट मत खोसा यांनी नोंदवले आहे.
सिंध प्रांतातल्या थट्टाजवळ दहशतवाद्यांचा प्रशिक्षणतळ होता आणि तिथे लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले आणि सागरी मार्गाने ते भारतात गेले, हा घटनाक्रम तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचे खोसांनी एका लेखात म्हटले आहे. मुंबईला जी स्फोटके धाडण्यात आली त्यांचे खोके या प्रशिक्षणतळावर मिळाल्याचेही ते नमूद करतात. 
अजमल कसाब हा पाकिस्तानी होता, तो कुठल्या शाळेत गेला, रहायचा कुठे आणि तो एलईटीमध्ये दाखल झाला अशा सगळ्या गोष्टीही पाकिस्तानी तपास पथकाने शोधल्याचे खोसा यांनी नमूद केले आहे. 
कसाब व त्याच्या सहका-यांनी ज्या डिंगीतून प्रवास केला ती डिंगी व तिचे इंजिन कराचीमधल्या एका दुकानातून विकत घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे. या इंजिनसाठी पैसे कुणी दिले हे शोधून पाकिस्तानने त्या व्यक्तीसही अटक केले आहे. इतकंच नाही तर या दहशतवाद्यांशी पाकिस्तानमधल्या कुठल्या ठिकाणाहून संवाद साधण्यात येत होता त्यासाठी इंटरनेटची कुठली यंत्रणा वापरली याचा छडाही पाकिस्तानी तपास संस्थेने लावल्याचे कोसा यांनी म्हटले आहे.
झकीर उर रेहमान लखवी आणि अन्य सहा जणांना अटकही झाली असून खूप दीर्घकाळ या खटल्याचे काम सुरू असून याप्रकरणी न्याय मिळण्याची खात्री पाकिस्तानने द्यायला हवी अशी सूचनाही खोसा यांनी केली आहे. 
एकमेकांवर दुगाण्या झाडण्यापेक्षा भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या कायदेतज्ज्ञांनी एकत्र बसून मार्ग काढायला हवा अशी सूचनाही खोसांनी केली आहे. या प्रकरणात अनेक आरोपी फरार असल्याचेही खोसांनी या लेखात म्हटले असून त्यांना पकडायला हवे त्याखेरीज हा खटला अंतिम परीणाम गाठू शकत नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.