शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

याकूबची धडपड!

By admin | Updated: July 25, 2015 01:58 IST

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील फाशीची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याने कायद्याचा कीस पाडत फाशीची

नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील फाशीची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याने कायद्याचा कीस पाडत फाशीची शिक्षा लांबणीवर टाकण्याची अखेरची धडपड चालविली आहे. तशातच त्याला फाशी देण्याच्या निर्णयाला गडद धार्मिक व राजकीय रंग चढल्याने नवा वाद सुरू झाला आहे. ३० जुलै रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात दिल्या जाणाऱ्या फाशीला स्थगिती देण्यासाठी त्याने सादर केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करणार असल्याचे सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. संबंधित फाईल माझ्याकडे आली असून, मी याआधीच खंडपीठाकडे सुनावणी सोपविली आहे, असे ते म्हणाले. २७ जुलै रोजी न्या. ए.आर. दवे, न्या. अरुण मिश्रा आणि अमितवा रॉय यांचे खंडपीठ या संवेदनशील प्रकरणी सुनावणी करेल. विविध प्रकरणांतील आरोपींना फाशीची अंमलबजावणी केली जाऊ नये यासाठी राजू रामचंद्रन, टी.आर. अंध्यारूजीना यांनी डेथ पेनल्टी लिटिगेशन क्लिनिकच्या वतीने याचिका दाखल केल्या आहेत. मी याकूबची याचिका दाखल केलेली आहे, अशी माहिती रामचंद्रन यांनी दिली. मेमन याचा जीव टांगणीला लागला असल्यामुळे कोणताही वेळ दवडला जाऊ नये, असे ते म्हणाले. टाडा न्यायालयाच्या डेथ वॉरंटनुसार याकूबला गुरुवारी सकाळी ७ वाजता फासावर लटकविले जाणार आहे, त्यामुळे क्लिनिकच्या वतीने याचिका दाखल केली आहे, असे अंध्यारूजीना यांनी म्हटले.याकूबचा युुक्तिवाद कायदेशीर प्रक्रिया न पाळता याकूबला फासावर लटकविण्यासाठी अकारण घाई केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात वेळ न दवडता हस्तक्षेप करावा. डेथ वॉरंट बजावताना आपल्याला कायदेशीर मदत मिळावी यासाठी योग्य प्रकारे नोटीस दिलेली नाही. डेथ वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया मुंबईत झाली असून, त्या वेळी मी नागपूरच्या कारागृहात होतो. त्यामुळे मला वकील नेमता आला नाही. आधीच फेरविचार (क्युरेटिव्ह) याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मुंबईच्या टाडा न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केले, याचा अर्थ नकारात्मक निष्पत्ती आधीच ठरविण्यात आली असा होतो, असा युक्तिवादही या याचिकेत केला आहे. सर्व कायदेशीर उपाययोजना करता याव्यात यासाठी फाशीला स्थगिती दिली जावी, अशी विनंती याकूबने गुरुवारी केली होती. मला सर्व कायद्यांनुसार सर्व कायदेशीर उपाययोजना अवलंबण्याचा अधिकार असून, डेथ वॉरंट जारी करताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे तो बेकायदेशीर ठरतो. मी राज्यपालांकडे दयेचा अर्जही केला आहे, असे त्याने याचिकेत स्पष्ट केले आहे.