शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

याकुबला फासावर लटकवा... पिडीत कुटुंबियांचा आवाज : दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम अवघ्या तीन तासांत तीन हजार नागरीकांचा पाठिंबा

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

याकुबला फासावर लटकवा...

याकुबला फासावर लटकवा...
पिडीत कुटुंबियांचा आवाज : दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम
अवघ्या तीन तासांत तीन हजार नागरीकांचा पाठिंबा
मुंबई : वयाच्या तेराव्या वर्षी १९९३च्या बॉम्ब स्फोट मालिकेत आईला गमावणार्‍या तुषार देशमुख या तरूणाला याकुब मेमनला फासावर लटकव या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागले. मंगळवारी तुषारने शिवाजी पार्क परिसरात याकुबच्या फाशीसाठी स्वाक्षरी मोहिम राबवली. अवघ्या काही तासात हजारो नागरिकांनी त्यावर सही करून याकुबला या टप्प्यावर कोणतीही दया न दाखवता फासावर लटकवा ही तुषारची भुमिका मान्य केली.
दादर परिसरात तुषार आई वडीलांसह रहायचा. १२ मार्च १९९३चा दुर्दैवी दिवस त्याच्या आयुष्यात आला आणि त्याचे सारे जीवनच विस्कळीत झाले. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना आईने दिलेला जेवणाचा डब्बा अखेरचा ठरला. आई महालक्ष्मी येथील जिंदाल कॅन्टीनमध्ये काम करत होती. त्या दिवशी ती कामावर गेली ती परत आलीच नाही. मी शाळेतून घरी आलो आणि आईची वाट पाहात बसलो. पण दुसर्‍या दिवशी आईचा मृतदेहच घरी आला...डोळयांमधून ओघळणारे अश्रु पुसत पुसत तुषार तो काळ सांगत होता.
आई गेल्याने जबरदस्त धक्का बसला होता. त्यातून सावरतो न सावरतो तोच बाबांनी दुसरा धक्का दिला. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या नव्या संसारात मी कुठेच नव्हतो. वडील असूनही मी अनाथ झालो होतो. तेव्हा शेजारी राहाणार्‍या योगेश म्हात्रे या मित्राने मला आसरा दिला. योगेशच्या आईने मला पंखाखाली घेतले, मुलासारखा सांभाळ केला, तुषार पुढे सांगत होता.
बॉम्बस्फोट घडवून माझे आयुष्य उध्वस्त करणार्‍या आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली. याकुब त्यापैकीच एक. शिक्षा ठोठावून ८ वर्षे लोटली तरी शिक्षेची अमलबजावणी होती नव्हती. माझ्याप्रमाणेच अनेक कुटुंबे त्या अमलबजावणीची वाट पाहात होते. अखेर तो दिवसही ठरला. पण या टप्प्यावर याकुबला फासावर लटकावू नका, त्याला दया दाखवा असा गळा काहींनी काढला. समोर आलेल्या पुराव्यांनुसार याकुबला टाडा न्यायालयाने फाशी ठोठावली. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही ती कायम केली. असे असताना फाशीचा विरोध करणे म्हणजे देशाच्या न्यायव्यवस्थेचा अपमान करण्यासारखे आहे. शिवाय याकुबला दया दाखवल्यास त्या बॉम्बस्फोटांमध्ये ठार-जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांच्या भावनांचाही घोर अपमान आहे, असेही तुषार सांगतो.
बॉम्बस्फोट मालिका घडविण्यासाठी लागणारे साहित्य असो अथवा आरोपींना पैसा पुरविण्याचे काम याकुबने केले. जर त्याने हे काम केलेच नसते तर बॉम्बस्फोट मालिका घडली नसती. त्यामुळे याकुबला फाशी झालीच पाहीजे, असे त्याचे म्हणणे आहे. यासाठी शिवाजी पार्क परीसरात सायंकाळी पाच वाजल्यापासुन त्याने स्वाक्षरी मोहीम राबविली. या मोहीमेला तब्बल तीन तासांत तीन हजाराहून अधिक नागरीकांनी पाठिंबा दिला.

राज्यपालांकडे सादर केल्या सह्या
मंगळवारी त्याने हा अहवाल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे सादर केला. मुळात या माध्यमातून मी जनतेचा आवाज राज्यपालांकडे पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते यावर काय भूमिका घेतात हे याकडे माझ्यासोबत सर्वांचेच लक्ष लागले आहे, असे तुषार सांगतो.