शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

याकूबची फाशी पुन्हा कायम

By admin | Updated: April 10, 2015 04:56 IST

मार्च १९९३मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या कटातील मुख्य सूत्रधार याकूब अब्दुल रझाक मेमन याने केलेली फेरविचार याचिका

नवी दिल्ली : मार्च १९९३मध्ये मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या कटातील मुख्य सूत्रधार याकूब अब्दुल रझाक मेमन याने केलेली फेरविचार याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध याकूब मेमनने केलेले अपील फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २०१३ रोजी त्याची फाशीची शिक्षा कायम केली होती. त्याविरुद्ध त्याने केलेली फेरविचार याचिकाही न्या. अनिल आर. दवे, न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. जोसेफ कुरियन यांच्या खंडपीठाने फेटाळली. २५७ निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या या पाकिस्तान पुरस्कृत भीषण दहशतवादी कृत्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेने मृत्युदंड दिलेला याकूब मेमन हा एकमेव आरोपी आहे. मूळ खटल्यात विशेष न्यायालयाने मेमनसह एकूण १२ आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र अपिलात सर्वोच्च न्यायालयाने मेमन वगळता इतर आरोपींची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप ठोठावली होती. मेमनचा दयेचा अर्जही राष्ट्रपतींनी याआधीच फेटाळला आहे. खरेतर, याकूबची सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेची दुसरी इनिंग्ज होती. पूर्वीच्या प्रथेनुसार फेरविचार याचिकांवर न्यायमूर्तींच्या दालनात अत्यंत त्रोटक सुनावणी व्हायची. परंतु फाशीच्या शिक्षेविरुद्ध केल्या जाणाऱ्या फेरविचार याचिकांची सुनावणी त्रिसदस्यीय खंडपीठाने खुल्या न्यायालयात करावी, असा निकाल पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला. त्यानुसार ज्यांच्या फेरविचार याचिका फेटाळल्या गेल्या आहेत; पण ज्यांच्या फाशीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही अशा याकूबसह इतरांना नव्याने फेरविचार याचिका करण्याची संधी मिळाली. या सर्व कायदेशीर डावपेचांचा आधार घेत विशेष न्यायालयाने ठोठावलेली फाशी टाळण्यात याकूबला गेली सात वर्षे यश आले आहे. आता ‘क्युरेटिव्ह पिटिशन’च्या नावाखाली तो आणखी किती वेळ काढू शकतो ते पाहायचे.