शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 09:06 IST

भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.

बेल्लारी : भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले.भाषणाची सुरुवात कानडीतून करून, नंतर हिंदीत भाषण करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकवार राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. ही विमाने केवढ्याला विकत घेतली, हे सांगायलाही मोदी सरकार तयार नाही, त्यामुळेच त्यात भाजपा सरकारने घोटाळा केला असल्याची शंका घ्यायला वाव आहे, असे सांगून ते म्हणाले की, त्या व्यवहाराची माहिती देण्याचे आश्वासन आधी सरकारने दिले होते. आता मात्र गोपनीयतेचे कारण पुढे करून जाणीवपूर्वक माहिती लपवली जात आहे.गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात विकास कामे व अनेक योजना राबविणारा काँग्रेस पक्ष आणि स्वत:ची आश्वासने न पाळणारा भारतीय जनता पक्ष यापैकी एकाची निवड राज्यातील जनतेने करायची आहे. कर्नाटकातील जनता सूज्ञ आहे. ती पु्न्हा काँग्रेसलाच विजयी करेल, अशी खात्री आपणास आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या दंगली कर्नाटकातील लोकांनी पाहिल्याच आहेत. त्यांना आपल्या राज्यात असे वातावरण निश्चितच नको आहे. बेल्लारीच्या खाणींची लूट भाजपा सरकारच्या काळात कशी झाली, याचा त्यांनी उल्लेख केला. खाणमाफिया रेड्डी बंधू यांना भाजपाचा कसा पाठिंबा होता, हे सर्वांना माहीत झाले आहे. कर्नाटकचे तत्कालिन लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनीही त्यावर ठपका ठेवला होता, असे राहुल गांधी म्हणाले. (वृत्तसंस्था)बेल्लारीशी जुने नातेबेल्लारी मतदारसंघाशी आपले जुने नाते आहे, याचा उल्लेख करून देताना राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांना १९९९ साली येथील जनतेने मोठ्या बहुमताने निवडून दिले होते, याची आठवण करून दिली. बल्लारीतील विधानसभेच्या सर्व ९ जागांवर काँग्रेसच विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKarnatakकर्नाटक