शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच, कर्नाटकात राहुल गांधी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 09:06 IST

भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.

बेल्लारी : भाजपा हा खोटे बोलणाºया मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील निवडणूक प्रचाराची शनिवारी सुरुवातच केली.कर्नाटकातील निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी तिथे काँग्रेस व भाजपा दोघांनीही प्रचार सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊ न कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे नमूद केले.भाषणाची सुरुवात कानडीतून करून, नंतर हिंदीत भाषण करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकवार राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. ही विमाने केवढ्याला विकत घेतली, हे सांगायलाही मोदी सरकार तयार नाही, त्यामुळेच त्यात भाजपा सरकारने घोटाळा केला असल्याची शंका घ्यायला वाव आहे, असे सांगून ते म्हणाले की, त्या व्यवहाराची माहिती देण्याचे आश्वासन आधी सरकारने दिले होते. आता मात्र गोपनीयतेचे कारण पुढे करून जाणीवपूर्वक माहिती लपवली जात आहे.गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात विकास कामे व अनेक योजना राबविणारा काँग्रेस पक्ष आणि स्वत:ची आश्वासने न पाळणारा भारतीय जनता पक्ष यापैकी एकाची निवड राज्यातील जनतेने करायची आहे. कर्नाटकातील जनता सूज्ञ आहे. ती पु्न्हा काँग्रेसलाच विजयी करेल, अशी खात्री आपणास आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या दंगली कर्नाटकातील लोकांनी पाहिल्याच आहेत. त्यांना आपल्या राज्यात असे वातावरण निश्चितच नको आहे. बेल्लारीच्या खाणींची लूट भाजपा सरकारच्या काळात कशी झाली, याचा त्यांनी उल्लेख केला. खाणमाफिया रेड्डी बंधू यांना भाजपाचा कसा पाठिंबा होता, हे सर्वांना माहीत झाले आहे. कर्नाटकचे तत्कालिन लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनीही त्यावर ठपका ठेवला होता, असे राहुल गांधी म्हणाले. (वृत्तसंस्था)बेल्लारीशी जुने नातेबेल्लारी मतदारसंघाशी आपले जुने नाते आहे, याचा उल्लेख करून देताना राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांना १९९९ साली येथील जनतेने मोठ्या बहुमताने निवडून दिले होते, याची आठवण करून दिली. बल्लारीतील विधानसभेच्या सर्व ९ जागांवर काँग्रेसच विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKarnatakकर्नाटक