शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाच्या आघाडीवर २०१६ वाईट

By admin | Updated: May 12, 2017 00:03 IST

पाकिस्तानच्या बाजूने २०१५ व त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षी घुसखोरींमध्ये खूपच वाढ झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केले आहे.

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानच्या बाजूने २०१५ व त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षी घुसखोरींमध्ये खूपच वाढ झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केले आहे. २०१६ या कॅलेंडर वर्षात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी यात २०१५ वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. गृहमंत्रालयाच्या २०१६-२०१७ वर्षाच्या वार्षिक अहवालात घुसखोरीचे प्रयत्न आणि कुंपणाच्या तारेतून झालेली घुसखोरी कमी झाली होती; परंतु ती फार मोठ्या प्रमाणावर २०१६ मध्ये (तक्ता पाहा) वाढली, असे म्हटले. २०१६ मध्ये दहशतवादी घटनांमध्ये २०१५ च्या तुलनेत एकदम वाढ झाली. मागच्या वर्षी ३२२ दहशतवादी हल्ले झाले होते, तर त्या आधीच्या वर्षी ते २०८ होते. २०१६ मध्ये सुरक्षा दलांचे कर्मचारी ठार मारले जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सततचा हिंसाचार आणि दहशतवादासाठी या अहवालात पाकिस्तानला पूर्णपणे दोष दिला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये १९९० मध्ये अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली तेव्हापासून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत १३ हजार ९३६ नागरिक व पाच हजार ४३ सुरक्षा दलाचे कर्मचारी ठार झाले आहेत. २०१६ या वर्षात पाकिस्तानच्या डावपेचांत बदल झाल्याचे दिसले, असे अहवाल म्हणतो. त्याने ‘नागरी विरोधा’वर मूलतत्त्ववादी विचार लादले. त्यासाठी हितसंबंधी गटांनी मूलतत्त्ववादी विचारांचा व समाजमाध्यमांचा वापर केला. असे असले तरी खोऱ्यात परिस्थितीत सुधारणाच होत आहे. प्रत्येक सरकारने वेगवेगळे उपाय राबविल्यामुळे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये विशेष पॅकेजची घोषणा केल्यामुळे खोऱ्यात शांतता परत निर्माण होईल, अशी सरकारला आशा आहे.