शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हे तर आजवरचे सर्वांत कमकुवत पीएमओ

By admin | Updated: October 28, 2015 01:59 IST

देशाच्या इतिहासातील सर्वांत कमकुवत असे सध्याचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी एकीकडे रालोआला अहेर दिला

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील सर्वांत कमकुवत असे सध्याचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी एकीकडे रालोआला अहेर दिला; तर दुसरीकडे शौरींनी केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. लोक जो विचार करतात त्यापेक्षा त्यांचे मत भिन्न आहे, असे सांगत केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सरकारच्या वतीने आरोप फेटाळून लावले.रालोआ सरकारकडे वारशाने चालत आलेल्या आव्हानांची लोकांना जाण आहे. या सरकारच्या काळात कोणताही घोटाळा, गैरव्यवहार किंवा एखादी चूक घडल्याचा एकही प्रसंग नाही. आपल्याकडे लोकशाही आहे. शौरींचे ते वैयक्तिक मत आहे. देशाचे मत त्यापेक्षा भिन्न आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदींना पाठिंबा आहे. भाजपाने एकापाठोपाठ निवडणुका जिंकण्याचा सपाटा लावला आहे, असे नायडूंनी स्पष्ट केले. काही लोक म्हणतात असहिष्णुता वाढली आहे. मतदारांनी जनतेला दिलेला जनादेश विरोधकांना पचवता येणे अवघड झाले आहे. विरोधकच असहिष्णू बनले आहेत, असा टोलाही नायडू यांनी हाणला. गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शौरी सोमवारी एका पुस्तक प्रकाशनाच्यावेळी म्हणाले की, सध्या अवलंबण्यात येत असलेले आर्थिक मार्ग, दिल्या जात असलेल्या हेडलाईन्स पाहता लोकांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळातील दिवस आठवू लागले आहे. ‘डॉक्टर सिंग को लोग याद करने लगे है’ काँग्रेस आणि गाय हेच सरकारच्या धोरणाचे वैशिष्ट्य ठरू लागले आहे. मी यापूर्वी एवढे कमकुवत पंतप्रधान कार्यालयाला बघितले नाही.