शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

हे तर आजवरचे सर्वांत कमकुवत पीएमओ

By admin | Updated: October 28, 2015 01:59 IST

देशाच्या इतिहासातील सर्वांत कमकुवत असे सध्याचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी एकीकडे रालोआला अहेर दिला

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील सर्वांत कमकुवत असे सध्याचे पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी एकीकडे रालोआला अहेर दिला; तर दुसरीकडे शौरींनी केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. लोक जो विचार करतात त्यापेक्षा त्यांचे मत भिन्न आहे, असे सांगत केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सरकारच्या वतीने आरोप फेटाळून लावले.रालोआ सरकारकडे वारशाने चालत आलेल्या आव्हानांची लोकांना जाण आहे. या सरकारच्या काळात कोणताही घोटाळा, गैरव्यवहार किंवा एखादी चूक घडल्याचा एकही प्रसंग नाही. आपल्याकडे लोकशाही आहे. शौरींचे ते वैयक्तिक मत आहे. देशाचे मत त्यापेक्षा भिन्न आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदींना पाठिंबा आहे. भाजपाने एकापाठोपाठ निवडणुका जिंकण्याचा सपाटा लावला आहे, असे नायडूंनी स्पष्ट केले. काही लोक म्हणतात असहिष्णुता वाढली आहे. मतदारांनी जनतेला दिलेला जनादेश विरोधकांना पचवता येणे अवघड झाले आहे. विरोधकच असहिष्णू बनले आहेत, असा टोलाही नायडू यांनी हाणला. गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शौरी सोमवारी एका पुस्तक प्रकाशनाच्यावेळी म्हणाले की, सध्या अवलंबण्यात येत असलेले आर्थिक मार्ग, दिल्या जात असलेल्या हेडलाईन्स पाहता लोकांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळातील दिवस आठवू लागले आहे. ‘डॉक्टर सिंग को लोग याद करने लगे है’ काँग्रेस आणि गाय हेच सरकारच्या धोरणाचे वैशिष्ट्य ठरू लागले आहे. मी यापूर्वी एवढे कमकुवत पंतप्रधान कार्यालयाला बघितले नाही.