शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

जगातील सर्वात उंच तिरंगा बनला खर्चीक; हवामानाचा फटका

By admin | Updated: March 26, 2017 00:46 IST

भारत आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील बाघा सीमेवर उभारलेल्या सर्वात उंच तिरंगा ध्वजाला वाईट हवामानाचा फटका

चंदिगढ : भारत आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील बाघा सीमेवर उभारलेल्या सर्वात उंच तिरंगा ध्वजाला वाईट हवामानाचा फटका बसला असून, २0 दिवसांत तो दोनदा बदलावा लागला आहे. तब्बल ३६0 फूट उंचीवर लावण्यात आलेल्या एका ध्वजाची किंमत एक लाख रुपये असून, महिन्यातून तीन वा चार वेळा तो बदलावा लागत असेल, तर  वर्षाला एकूण ६0 लाख रुपये  खर्च येईल. त्यामुळे स्वातंत्र्य  दिन, प्रजासत्ताक दिन तसेच अन्य काही सण व उत्सवांच्या वेळीच तो  फडकावा की काय, असा विचार सुरू झाला आहे.बाघा-अटारी सीमेवर भारतीय ध्वज उभारण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला होता. जगातील सर्वात उंच भारतीय ध्वज अशी त्याची ओळख होती. पण इतक्या उंचीवर असलेल्या तिरंग्याची देखभाल करणे अवघड होऊ न बसले आहे. तिरंगा ध्वज ५ मार्चला फडकावण्यात आला आणि तीन आठवड्यांच्या आत त्याचे नुकसान झाल्याने तो काढून तिथे नवा ध्वज लावाला लागला. इतक्या उंच असलेला तिरंगा ध्वज प्रामुख्याने जोरदार वाऱ्यामुळे खराब होत आहे. वाऱ्यामुळे त्याचे नुकसान होत असल्याने तो सतत बदलावा लागणार असेल, तर त्यासाठी प्रचंड खर्च येईल, असे देखभाल समितीचे म्हणणे आहे. मुळात त्याचे इतक्या लवकर नुकसान होईल, असा अंदाजच आला नव्हता. सध्या तिथे फडकावण्यासाठी त्या आकाराचे केवळ १२ ध्वज शिल्लक आहेत. (वृत्तसंस्था)पाकिस्तानच्या कुरबुरी हा ध्वज फडकावण्यात आला, तेव्हा पाकिस्तानतर्फे कुरबुरी करण्यात आल्या होत्या. त्यात छुपे कॅमेरे बसवून पाकिस्तानात हेरगिरी केली जात आहे, यापासून असा ध्वज म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, अशा तक्रारी होत होत्या. पण त्यात अर्थातच तथ्य नाही. आता पाकिस्तानच्या तक्रारीही थांबल्या आहेत. मात्र खर्च हाच मोठा प्रश्न बनून राहिला आहे.एका ध्वजाचा खर्च १ लाख रुपये एका ध्वजाचा खर्चच मुळी १ लाख रुपये आहे. यावर उपाय शोधण्यासाठी देखभाल समितीची लवकरच बैठक होणार आहे. पॅराशूटसाठी वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकपासून तिरंगा तयार केल्यास तो अधिक काळ टिकेल, असा अंदाज आहे. त्या फॅब्रिकच्या एका ध्वजासाठी चार लाख रुपये खर्च येईल आणि तो तीन महिने टिकेल, असे भारत इलेक्ट्रिकल्सचे कमल कोहली यांचे म्हणणे आहे. सध्याच्या ध्वज उभारणीचे काम भारत इलेक्ट्रिकल्सनेच केले होते. पर्याय म्हणून एकदा पॅराशूट फॅब्रिकचा ध्वज तयार करून लावावा, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दर महिन्याला चार ध्वज लागणार असतील, तर ६0 लाख रुपये कोठून आणायचे, हा प्रश्न समितीला आहे. पंजाब आणि केंद्र सरकारने हा खर्च उचलल्यास अडचण येणार नाही, त्यांच्यासाठी ही रक्कम मोठी नाही, असे समितीचे म्हणणे आहे.