शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

जगातील सर्वात उंच तिरंगा बनला खर्चीक; हवामानाचा फटका

By admin | Updated: March 26, 2017 00:46 IST

भारत आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील बाघा सीमेवर उभारलेल्या सर्वात उंच तिरंगा ध्वजाला वाईट हवामानाचा फटका

चंदिगढ : भारत आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील बाघा सीमेवर उभारलेल्या सर्वात उंच तिरंगा ध्वजाला वाईट हवामानाचा फटका बसला असून, २0 दिवसांत तो दोनदा बदलावा लागला आहे. तब्बल ३६0 फूट उंचीवर लावण्यात आलेल्या एका ध्वजाची किंमत एक लाख रुपये असून, महिन्यातून तीन वा चार वेळा तो बदलावा लागत असेल, तर  वर्षाला एकूण ६0 लाख रुपये  खर्च येईल. त्यामुळे स्वातंत्र्य  दिन, प्रजासत्ताक दिन तसेच अन्य काही सण व उत्सवांच्या वेळीच तो  फडकावा की काय, असा विचार सुरू झाला आहे.बाघा-अटारी सीमेवर भारतीय ध्वज उभारण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला होता. जगातील सर्वात उंच भारतीय ध्वज अशी त्याची ओळख होती. पण इतक्या उंचीवर असलेल्या तिरंग्याची देखभाल करणे अवघड होऊ न बसले आहे. तिरंगा ध्वज ५ मार्चला फडकावण्यात आला आणि तीन आठवड्यांच्या आत त्याचे नुकसान झाल्याने तो काढून तिथे नवा ध्वज लावाला लागला. इतक्या उंच असलेला तिरंगा ध्वज प्रामुख्याने जोरदार वाऱ्यामुळे खराब होत आहे. वाऱ्यामुळे त्याचे नुकसान होत असल्याने तो सतत बदलावा लागणार असेल, तर त्यासाठी प्रचंड खर्च येईल, असे देखभाल समितीचे म्हणणे आहे. मुळात त्याचे इतक्या लवकर नुकसान होईल, असा अंदाजच आला नव्हता. सध्या तिथे फडकावण्यासाठी त्या आकाराचे केवळ १२ ध्वज शिल्लक आहेत. (वृत्तसंस्था)पाकिस्तानच्या कुरबुरी हा ध्वज फडकावण्यात आला, तेव्हा पाकिस्तानतर्फे कुरबुरी करण्यात आल्या होत्या. त्यात छुपे कॅमेरे बसवून पाकिस्तानात हेरगिरी केली जात आहे, यापासून असा ध्वज म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, अशा तक्रारी होत होत्या. पण त्यात अर्थातच तथ्य नाही. आता पाकिस्तानच्या तक्रारीही थांबल्या आहेत. मात्र खर्च हाच मोठा प्रश्न बनून राहिला आहे.एका ध्वजाचा खर्च १ लाख रुपये एका ध्वजाचा खर्चच मुळी १ लाख रुपये आहे. यावर उपाय शोधण्यासाठी देखभाल समितीची लवकरच बैठक होणार आहे. पॅराशूटसाठी वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकपासून तिरंगा तयार केल्यास तो अधिक काळ टिकेल, असा अंदाज आहे. त्या फॅब्रिकच्या एका ध्वजासाठी चार लाख रुपये खर्च येईल आणि तो तीन महिने टिकेल, असे भारत इलेक्ट्रिकल्सचे कमल कोहली यांचे म्हणणे आहे. सध्याच्या ध्वज उभारणीचे काम भारत इलेक्ट्रिकल्सनेच केले होते. पर्याय म्हणून एकदा पॅराशूट फॅब्रिकचा ध्वज तयार करून लावावा, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दर महिन्याला चार ध्वज लागणार असतील, तर ६0 लाख रुपये कोठून आणायचे, हा प्रश्न समितीला आहे. पंजाब आणि केंद्र सरकारने हा खर्च उचलल्यास अडचण येणार नाही, त्यांच्यासाठी ही रक्कम मोठी नाही, असे समितीचे म्हणणे आहे.