शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

विश्व सांस्कृतिक महोत्सवास यमुनेच्या तटावर थाटात प्रारंभ

By admin | Updated: March 12, 2016 03:00 IST

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली.

नवी दिल्ली : श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली. जगभरातील कलाकारांची गीते, संगीत, नृत्य यांचा संगम असलेल्या या महोत्सवाने लाखो लोकांना भर पावसातही मंत्रमुग्ध केले. पावसाच्या सरीमुळे कार्यक्रमाची सुरुवात अर्धा तास उशिराने झाली. नादस्वरम हा दक्षिण भारतातील ४0 कलाकारांच्या सनईवादनाचा कार्यक्रम अभूतपूर्व होता. पण त्याचबरोबर १,000 वेदाचार्यांनी तिथे मंत्रोच्चारण केल्याने कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले.त्यानंतर ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या चंद्रिका टंडन यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला आणि मग महाराष्ट्रातील १५00 कलाकारांचा ढोल ताशा आणि सोबतीला पखवाजवादन. जयपूर आणि लखनौमधील १७00 कलाकारांनी कथ्थक नृत्य सादर करून महोत्सवात वेगळाच रंग भरला. शिवाय तामिळनाडूतील १७00 भरतनाट्यम नर्तक आणि नर्तिका, केरळमधील १३१0 कथकली नर्तक आणि गुजरातमधील १५00 गरबा नर्तक-नर्तिका यांच्यानंतर हिमाचल प्रदेशातील १0५0 नर्तकांमुळे महोत्सव पाहण्यास आलेल्या लाखो लोकांचे पाय आपोआप थिरकू लागले. दिल्लीकरांनीच काय, पण देशभरातील लोकांनी असा नृत्य, संगीत, गीत यांचा असा मिलाफ यापूर्वी अनुभवला नसावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करताना भारतीय संस्कृती आणि जगभरातील विविध देशांची संस्कृती यांना जोडण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. उद्घाटन समारंभाला साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, उद्योग, समाजसेवा अशा सर्व क्षेत्रांतील अनेक नामवंत उपस्थित होते. शिवाय तीन दिवसांच्या महोत्सवात २00 खासदार हजर राहणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)यमुना नदीचे पात्र आणि तट अशा तब्बल १,000 एकर जमिनीवर हा तीन दिवसांचा महोत्सव चालणार आहे. तो सुरू होण्यापूर्वी, अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत अनेक वाद झाले. पण ते मिटले आणि कार्यक्रम झोकात सुरू झाला असून, त्यात जगभरातील १५५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील ३८ हजार कलाकार सहभागी झाले आहेत. या तीन दिवसांत ८५00 वादक ५0 प्रकारच्या वाद्यांतून वेगळीच सुरावट सादर करणार असून, त्यावर ३५00 कलाकार नृत्य सादर करतील. त्यासाठी उभारण्यात आलेला रंगमंचही अवाढव्य आहे. रंगमंचाची जागाच तब्बल सात एकरांची आहे. >1 या महोत्सवासाठी संपूर्ण दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, १२ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाचे जवान, सुरक्षा दलांचे जवान असा मोठाच फौजफाटा महोत्सवाच्या आसपास आहे. 2 दिल्लीतील ८0 हजार पोलीस या तीन दिवसांच्या काळात डोळ्यात तेल घालून सर्व सुरक्षेची तसेच कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेणार आहेत. दिल्लीच्या काही भागांतून विमानांना बंदी घालण्यात आली आहे. 3 दिल्लीच्या जवळपास सर्वच भागांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आल्याने तीन दिवसांत दिल्लीकरांना कामासाठी बाहेर पडताना त्रासही सहन करावा लागणार आहे.