शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

विश्व सांस्कृतिक महोत्सवास यमुनेच्या तटावर थाटात प्रारंभ

By admin | Updated: March 12, 2016 03:00 IST

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली.

नवी दिल्ली : श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली. जगभरातील कलाकारांची गीते, संगीत, नृत्य यांचा संगम असलेल्या या महोत्सवाने लाखो लोकांना भर पावसातही मंत्रमुग्ध केले. पावसाच्या सरीमुळे कार्यक्रमाची सुरुवात अर्धा तास उशिराने झाली. नादस्वरम हा दक्षिण भारतातील ४0 कलाकारांच्या सनईवादनाचा कार्यक्रम अभूतपूर्व होता. पण त्याचबरोबर १,000 वेदाचार्यांनी तिथे मंत्रोच्चारण केल्याने कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले.त्यानंतर ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या चंद्रिका टंडन यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला आणि मग महाराष्ट्रातील १५00 कलाकारांचा ढोल ताशा आणि सोबतीला पखवाजवादन. जयपूर आणि लखनौमधील १७00 कलाकारांनी कथ्थक नृत्य सादर करून महोत्सवात वेगळाच रंग भरला. शिवाय तामिळनाडूतील १७00 भरतनाट्यम नर्तक आणि नर्तिका, केरळमधील १३१0 कथकली नर्तक आणि गुजरातमधील १५00 गरबा नर्तक-नर्तिका यांच्यानंतर हिमाचल प्रदेशातील १0५0 नर्तकांमुळे महोत्सव पाहण्यास आलेल्या लाखो लोकांचे पाय आपोआप थिरकू लागले. दिल्लीकरांनीच काय, पण देशभरातील लोकांनी असा नृत्य, संगीत, गीत यांचा असा मिलाफ यापूर्वी अनुभवला नसावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करताना भारतीय संस्कृती आणि जगभरातील विविध देशांची संस्कृती यांना जोडण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. उद्घाटन समारंभाला साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, उद्योग, समाजसेवा अशा सर्व क्षेत्रांतील अनेक नामवंत उपस्थित होते. शिवाय तीन दिवसांच्या महोत्सवात २00 खासदार हजर राहणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)यमुना नदीचे पात्र आणि तट अशा तब्बल १,000 एकर जमिनीवर हा तीन दिवसांचा महोत्सव चालणार आहे. तो सुरू होण्यापूर्वी, अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत अनेक वाद झाले. पण ते मिटले आणि कार्यक्रम झोकात सुरू झाला असून, त्यात जगभरातील १५५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील ३८ हजार कलाकार सहभागी झाले आहेत. या तीन दिवसांत ८५00 वादक ५0 प्रकारच्या वाद्यांतून वेगळीच सुरावट सादर करणार असून, त्यावर ३५00 कलाकार नृत्य सादर करतील. त्यासाठी उभारण्यात आलेला रंगमंचही अवाढव्य आहे. रंगमंचाची जागाच तब्बल सात एकरांची आहे. >1 या महोत्सवासाठी संपूर्ण दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, १२ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाचे जवान, सुरक्षा दलांचे जवान असा मोठाच फौजफाटा महोत्सवाच्या आसपास आहे. 2 दिल्लीतील ८0 हजार पोलीस या तीन दिवसांच्या काळात डोळ्यात तेल घालून सर्व सुरक्षेची तसेच कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेणार आहेत. दिल्लीच्या काही भागांतून विमानांना बंदी घालण्यात आली आहे. 3 दिल्लीच्या जवळपास सर्वच भागांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आल्याने तीन दिवसांत दिल्लीकरांना कामासाठी बाहेर पडताना त्रासही सहन करावा लागणार आहे.