शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

विश्व सांस्कृतिक महोत्सवास यमुनेच्या तटावर थाटात प्रारंभ

By admin | Updated: March 12, 2016 03:00 IST

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली.

नवी दिल्ली : श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या भव्य दिव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी दिल्लीच्या यमुना तटावर मोठ्या जोमात झाली. जगभरातील कलाकारांची गीते, संगीत, नृत्य यांचा संगम असलेल्या या महोत्सवाने लाखो लोकांना भर पावसातही मंत्रमुग्ध केले. पावसाच्या सरीमुळे कार्यक्रमाची सुरुवात अर्धा तास उशिराने झाली. नादस्वरम हा दक्षिण भारतातील ४0 कलाकारांच्या सनईवादनाचा कार्यक्रम अभूतपूर्व होता. पण त्याचबरोबर १,000 वेदाचार्यांनी तिथे मंत्रोच्चारण केल्याने कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले.त्यानंतर ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या चंद्रिका टंडन यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला आणि मग महाराष्ट्रातील १५00 कलाकारांचा ढोल ताशा आणि सोबतीला पखवाजवादन. जयपूर आणि लखनौमधील १७00 कलाकारांनी कथ्थक नृत्य सादर करून महोत्सवात वेगळाच रंग भरला. शिवाय तामिळनाडूतील १७00 भरतनाट्यम नर्तक आणि नर्तिका, केरळमधील १३१0 कथकली नर्तक आणि गुजरातमधील १५00 गरबा नर्तक-नर्तिका यांच्यानंतर हिमाचल प्रदेशातील १0५0 नर्तकांमुळे महोत्सव पाहण्यास आलेल्या लाखो लोकांचे पाय आपोआप थिरकू लागले. दिल्लीकरांनीच काय, पण देशभरातील लोकांनी असा नृत्य, संगीत, गीत यांचा असा मिलाफ यापूर्वी अनुभवला नसावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करताना भारतीय संस्कृती आणि जगभरातील विविध देशांची संस्कृती यांना जोडण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. उद्घाटन समारंभाला साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, उद्योग, समाजसेवा अशा सर्व क्षेत्रांतील अनेक नामवंत उपस्थित होते. शिवाय तीन दिवसांच्या महोत्सवात २00 खासदार हजर राहणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)यमुना नदीचे पात्र आणि तट अशा तब्बल १,000 एकर जमिनीवर हा तीन दिवसांचा महोत्सव चालणार आहे. तो सुरू होण्यापूर्वी, अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत अनेक वाद झाले. पण ते मिटले आणि कार्यक्रम झोकात सुरू झाला असून, त्यात जगभरातील १५५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. आर्ट आॅफ लिव्हिंगच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील ३८ हजार कलाकार सहभागी झाले आहेत. या तीन दिवसांत ८५00 वादक ५0 प्रकारच्या वाद्यांतून वेगळीच सुरावट सादर करणार असून, त्यावर ३५00 कलाकार नृत्य सादर करतील. त्यासाठी उभारण्यात आलेला रंगमंचही अवाढव्य आहे. रंगमंचाची जागाच तब्बल सात एकरांची आहे. >1 या महोत्सवासाठी संपूर्ण दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, १२ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्रीय व राज्य राखीव दलाचे जवान, सुरक्षा दलांचे जवान असा मोठाच फौजफाटा महोत्सवाच्या आसपास आहे. 2 दिल्लीतील ८0 हजार पोलीस या तीन दिवसांच्या काळात डोळ्यात तेल घालून सर्व सुरक्षेची तसेच कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेणार आहेत. दिल्लीच्या काही भागांतून विमानांना बंदी घालण्यात आली आहे. 3 दिल्लीच्या जवळपास सर्वच भागांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आल्याने तीन दिवसांत दिल्लीकरांना कामासाठी बाहेर पडताना त्रासही सहन करावा लागणार आहे.