शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले

By महेश गलांडे | Updated: December 13, 2020 16:38 IST

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय.

ठळक मुद्देबालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते.

डेहरादून - बिहारच्या आराह येथील बालबंका तिवारी या तरुणाने सैन्य दलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अतिशय खडतर आणि संघर्षमय प्रवास करुन त्यांनी हे यश संपादन केलंय. मुलाच्या अंगावर सैन्य दलाची गणवेश पाहून त्याच्या आई आणि पत्नील अत्यानंद झाला. त्यावेळी, आपल्या मुलाने महाविद्यालयीन जीवनात जगताना केलेल्या कष्टाची आठवणण झाल्याने आई मुन्ना देवी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. बालबंका यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासूनच कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, 50 ते 100 रुपये मिळविण्यासाठी ते दिवसभर म्हणजेच 12 तास काम करत. बालबंका यांचे वडिल शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती. त्यामुळे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना लवकरच कामावर जावे लागले. 12 वी नंतर आरा येथून मी ओडिशातील राऊरकला येथे गेलो. दरम्यानच्या काळात लोखंडाच्या कंपनीत आणि फरसाणच्या कंपनीतही काम केलं. येथून मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं, असं बालबंका यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. कमवा आणि शिका असाच त्यांचा प्रवास राहिला.

यापूर्वी होते सैन्यदलात शिपाई

सैन्य दलात अधिकारी बनण्यापूर्वी ते सैन्य दलातच शिपाई म्हणून भरती झाले होते. तिवारी यांनी 2012 मध्ये भोपाळच्या ईएमई सेंटरमधून आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच परीक्षा पास केली होती. शिपाई पदी रुजू झाल्यानंतरच त्यांनी आर्मी कॅडेट कॉलेजसाठी तयारी सुरू केली. या परीक्षेत 2017 साली त्यांना यश मिळालं. आता सैन्य दलात अधिकारी बनून देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्यानं मला अत्यानंद झाल्याचे ते म्हणतात.

वडिलांनाही अत्यानंद 

आपल्या एका नातेवाईकांकडून बालबंका यांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना गावात मिळणाऱ्या मान-सन्मानामुळे मी प्रभावित झालो होतो. त्यामुळेच, मी सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न वारंवार पाहात होतो, त्यापासून मी कधीही दूर पळालो नाही. आता, माझे वडिल उद्या वर्तमानपत्रात बातमी पाहतील आणि संपूर्ण गावाला माझ्या यशाची गोष्टी सांगतील, असेही बालबंका यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOdishaओदिशाBiharबिहार