शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले

By महेश गलांडे | Updated: December 13, 2020 16:38 IST

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय.

ठळक मुद्देबालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते.

डेहरादून - बिहारच्या आराह येथील बालबंका तिवारी या तरुणाने सैन्य दलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अतिशय खडतर आणि संघर्षमय प्रवास करुन त्यांनी हे यश संपादन केलंय. मुलाच्या अंगावर सैन्य दलाची गणवेश पाहून त्याच्या आई आणि पत्नील अत्यानंद झाला. त्यावेळी, आपल्या मुलाने महाविद्यालयीन जीवनात जगताना केलेल्या कष्टाची आठवणण झाल्याने आई मुन्ना देवी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. बालबंका यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासूनच कामाला सुरुवात केली होती. त्यावेळी, 50 ते 100 रुपये मिळविण्यासाठी ते दिवसभर म्हणजेच 12 तास काम करत. बालबंका यांचे वडिल शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती. त्यामुळे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना लवकरच कामावर जावे लागले. 12 वी नंतर आरा येथून मी ओडिशातील राऊरकला येथे गेलो. दरम्यानच्या काळात लोखंडाच्या कंपनीत आणि फरसाणच्या कंपनीतही काम केलं. येथून मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं, असं बालबंका यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. कमवा आणि शिका असाच त्यांचा प्रवास राहिला.

यापूर्वी होते सैन्यदलात शिपाई

सैन्य दलात अधिकारी बनण्यापूर्वी ते सैन्य दलातच शिपाई म्हणून भरती झाले होते. तिवारी यांनी 2012 मध्ये भोपाळच्या ईएमई सेंटरमधून आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच परीक्षा पास केली होती. शिपाई पदी रुजू झाल्यानंतरच त्यांनी आर्मी कॅडेट कॉलेजसाठी तयारी सुरू केली. या परीक्षेत 2017 साली त्यांना यश मिळालं. आता सैन्य दलात अधिकारी बनून देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्यानं मला अत्यानंद झाल्याचे ते म्हणतात.

वडिलांनाही अत्यानंद 

आपल्या एका नातेवाईकांकडून बालबंका यांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना गावात मिळणाऱ्या मान-सन्मानामुळे मी प्रभावित झालो होतो. त्यामुळेच, मी सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न वारंवार पाहात होतो, त्यापासून मी कधीही दूर पळालो नाही. आता, माझे वडिल उद्या वर्तमानपत्रात बातमी पाहतील आणि संपूर्ण गावाला माझ्या यशाची गोष्टी सांगतील, असेही बालबंका यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOdishaओदिशाBiharबिहार