शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

मदरशांचे कार्य महत्वाचे, शाळांचा दर्जा हवा

By admin | Updated: July 3, 2015 04:07 IST

सध्या लागू असलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार इस्लामचे धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांना नियमित शाळा मानणे शक्य नसले तरी

नवी दिल्ली: सध्या लागू असलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार इस्लामचे धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांना नियमित शाळा मानणे शक्य नसले तरी मदरशांनी देशात केलेले खूप चांगले काम पाहाता शाळांचा दर्जा देऊन त्यांना शिक्षणच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अल्पसंख्य व्यवहार राज्यमंत्री मुखतार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले.वृत्तसंस्थेशी बोलताना नक्वी म्हणाले की, मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करण्याची शक्यता आपले मंत्रालय तपासून पाहील.पंतप्रधानांनी एका हातात कुराण व दुसऱ्या हातात संगणक असलेल्या भारतीय लोकांचे स्वप्न बोलून दाखविले आहे व ते साकार करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत, असे सांगून नक्वी म्हणाले की, मदरशांना मुख्य प्रवाहाप्रमाणे शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. अन्यथा ते मुख्य प्रवाहापासून आणखी दूर जातील.नक्वी म्हणाले की, अनेक मदरशांची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची आहे व त्यामुळे ते फक्त धार्मिक शिक्षण देतात. केवळ धार्मिक शिक्षणाने मुस्लिमांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार नाही. मदरशांनीही पुरोगामी शिक्षण देण्याची गरज आहे.याच दृष्टीने कायद्याच्या चौकटीत येत नसले तरी राज्य सरकारे यापुढेही मदरशांना मदत करणे सुरुच ठेवतील, असेही त्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)मदरसा बोर्ड स्थापन करावेराज्यातील मदरसे धार्मिक शिक्षणासाठी सुरु आहेत. त्यामध्ये औपचारिक शिक्षण दिले जात नाही. देशातील पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आदी ठिकाणी मदरसा बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यात मदरसा बोर्ड स्थापन करुन त्यामध्ये शासनाच्या धोरणानुसार शिक्षण दिल्यास त्यामधील गोरगरीब, होतकरु विद्यार्थ्यांचे भले होईल. याबाबतचा अहवालही काही वर्षांपुर्वी अभ्यंकर समितीने शासनाला सादर केला आहे.- ज.मो. अभ्यंकर, निवृत्त शिक्षणाधिकारीमदरशांमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावेविद्यार्थ्यांना शिक्षण देताना शासन कोणत्याही धर्माचे शिक्षण देत नाही. त्याचप्रमाणे मदरशांमधील विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक घडविण्यासाठी आवश्यक असलेले चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मदरशांमधील विद्यार्थ्यांना शाळाबाह्ण ठरविण्याचा शासनाचा निर्णय मदरशांवर अन्यायकारक ठरेल. -प्रशांत रेडीज, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्तेधार्मिक स्वातंत्र्यावर गदा नकोमदरशांमधील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे पण, त्याचवेळी शासनाने मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी मदरशांचा शाळेसारखा विकास करावा लागेल. - अ‍ॅड. मुकेश समर्थ