शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महिला आयोगाने स्वत:ला न्यायदेवता समजू नये - उच्च न्यायालय

By admin | Updated: March 29, 2017 10:32 IST

एखाद्या प्रकरणात न्यायालयाप्रमाणे अंतिम निष्कर्ष काढण्याचा अधिकार राष्ट्रीय महिला आयोगाकडे नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - एखाद्या प्रकरणात न्यायालयाप्रमाणे अंतिम निष्कर्ष काढण्याचा अधिकार राष्ट्रीय महिला आयोगाकडे नसल्याचं सांगत उच्च न्यायालयाने चांगलंच फटकारलं आहे. वैवाहिक आयुष्याशी संबंधित एखाद्या वादामध्ये महिला आयोग एम्प्लॉयरला कोणत्याही प्रकारचा सल्ला देऊ शकत नाही असं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी रोहिणी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाने हेदेखील स्पष्ट केलं आहे की, 'महिला आयोग महिलांच्या अधिकारासाठी काम करत असतं, त्यामुळे महिलांशी संबंधित तक्रारींची दखल तसंच माहिती घेणं हा महिला आयोगाचा अधिकार आहे. पण एखाद्या प्रकरणात न्यायालयाप्रमाणे निष्कर्ष काढून ते निकाली लावण्याचा कायदेशीर अधिकार त्यांच्याकडे नाही'. 
 
काय होतं प्रकरण - 
हे प्रकरण वैवाहिक आयुष्याशी संबंधित वादाशी जोडलेलं आहे. तक्रार करणारी महिला ही महिला आणि बाल विकास मंत्रालयात काम करते. तिचा पती सिंगापूरमध्ये एका कंपनीत मरिन इंजिनिअर म्हणून काम करतो. 2008 मध्ये दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना मूल झालं. मात्र यानंतरही त्यांच्यातील मतभेद कायमच होते, मात्र यावेळी ते टोकाला पोहोचले होते. महिलेने पतीविरोधात महिला आयोगात धाव घेत शारिरीक आणि मानसिक त्रास देत असल्याची तक्रार केली. तसंच जोपर्यंत हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत आपल्या पतीला परदेशी जाण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणीही केली. 
 
महिला आयोगाने लिहिलं होतं पत्र - 
महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत सिंगापूरमधील भारतीय दुतावासाला पत्र लिहिलं होतं. त्याची एक प्रत महिलेचा पती काम करत असलेल्या सिंगापूरमधील कार्यालयात पाठवण्यात आली. हे पत्र मिळाल्यानंतर पतीवर कारवाई करत कंपनीने 24 मार्च 2013 रोजी त्याला कामावरुन काढून टाकलं होतं. पतीने याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत महिला आयोगाला आपलं पत्र मागे घेण्याची मागणी केली. तसंच यासोबत नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली. 
 
याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या सिंगल बेंचने 31 मार्च 2016 रोजी निर्णय देत महिला आयोगाचं काम महिलांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्याचा अभ्यास करणं आहे असं म्हटलं होतं. महिलेने सिंगल बेंचच्या या निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र न्यायालयाने हा निर्णय योग्य ठरवत कायम ठेवला आहे.