शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिल्लीपेक्षा मुंबईत महिला जास्त सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 02:37 IST

महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे

मुंबई : महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित असतील, यासाठी कायम प्रयत्नशील असल्याने दिल्लीपेक्षा आजही मुंबईत महिला जास्त सुरक्षित आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मुले आणि महिलांच्या हक्कासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेतर्फे ‘भारतातील मुलींचे जग, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ हा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला.या महाराष्ट्र केंद्री अभ्यासात मुंबई महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका (मोठी शहरे), बारामती व लोणावळा यांसारख्या छोट्या शहरांमधील पौगंडावस्थेतील ५०९ मुली, पौगंडावस्थेतील १०९ मुलगे, १३५ पालक आणि४२ तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या.धोरणात्मक सुधारणा, पोलीस दलात अधिक महिलांचा समावेश, सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वयंसाहाय्य गट, बालगट, मातांचे गट या सामाजिकसाहाय्य गटांचा अधिक चांगल्या प्रकारे विकास करणे. टॅक्सी व बस चालकांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधील सर्व चालकांना लैंगिक प्रशिक्षण आणि मुलींच्या सुरक्षेततेसाठी अधिक स्रोत उपलब्ध होण्याची आवश्यकता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अभ्यासातील सर्वेक्षण आसाम, दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये करण्यात आले.सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे. या हक्काचे उल्लंघन होणार नाही आणि ही मुले सुरक्षितपणे कुठेही हिंडू-फिरू शकतील, याची आपण खातरजमा केली पाहिजे. आपण अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे आणि पालकांसह विविध भागधारकांचे सबलीकरण केले पाहिजे व मुलांच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घ्याव्यात, जेणेकरून मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांचा कायद्यावर विश्वास असेल.- संजय शर्मा, सेव्ह द चिल्ड्रन, महाराष्ट्र प्रमुख