शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

दिल्लीपेक्षा मुंबईत महिला जास्त सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 02:37 IST

महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे

मुंबई : महिलांच्या सुरक्षेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध विभाग, नागरी संस्थांबरोबर काम करीत आहोत. सर्व विभागांच्या सहयोगी प्रयत्नांमध्ये विश्वास आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित असतील, यासाठी कायम प्रयत्नशील असल्याने दिल्लीपेक्षा आजही मुंबईत महिला जास्त सुरक्षित आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.‘सेव्ह द चिल्ड्रन’ या मुले आणि महिलांच्या हक्कासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेतर्फे ‘भारतातील मुलींचे जग, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ हा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला.या महाराष्ट्र केंद्री अभ्यासात मुंबई महानगरपालिका, नांदेड महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका (मोठी शहरे), बारामती व लोणावळा यांसारख्या छोट्या शहरांमधील पौगंडावस्थेतील ५०९ मुली, पौगंडावस्थेतील १०९ मुलगे, १३५ पालक आणि४२ तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या.धोरणात्मक सुधारणा, पोलीस दलात अधिक महिलांचा समावेश, सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वयंसाहाय्य गट, बालगट, मातांचे गट या सामाजिकसाहाय्य गटांचा अधिक चांगल्या प्रकारे विकास करणे. टॅक्सी व बस चालकांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधील सर्व चालकांना लैंगिक प्रशिक्षण आणि मुलींच्या सुरक्षेततेसाठी अधिक स्रोत उपलब्ध होण्याची आवश्यकता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अभ्यासातील सर्वेक्षण आसाम, दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये करण्यात आले.सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे. या हक्काचे उल्लंघन होणार नाही आणि ही मुले सुरक्षितपणे कुठेही हिंडू-फिरू शकतील, याची आपण खातरजमा केली पाहिजे. आपण अधिक संवेदनशील होणे गरजेचे आहे आणि पालकांसह विविध भागधारकांचे सबलीकरण केले पाहिजे व मुलांच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घ्याव्यात, जेणेकरून मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांचा कायद्यावर विश्वास असेल.- संजय शर्मा, सेव्ह द चिल्ड्रन, महाराष्ट्र प्रमुख