शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री अजूनही बंधनात : शबाना आझमी

By admin | Updated: March 8, 2016 08:52 IST

'लोकमत वूमन समिट' मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केलेले मनोगत आज महिला दिनानिमित्त खास तुमच्यासाठी पुन्हा...

 
'लोकमत वूमन समिट' मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केलेले मनोगत आज महिला दिनानिमित्त खास तुमच्यासाठी पुन्हा देत आहोत.
 
पुणो : स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी अनेक वर्षापासून प्रय} होत आहेत. मात्र, त्याचा वेग आपल्याला हवा तसा नाहीये. मुळात आपण एकाच वेळी वेगवेगळ्या शतकांत जगत आहोत. एकाच वेळी बदलते चित्र दिसत आहे, तर त्याच वेळी बंधनात अडकलेली स्त्री दिसत आहे. त्यामुळे बदलाची प्रक्रिया ही चिरंतन आहे आणि शाश्वत बदलांसाठी खूप काळ जावा लागेल. पण हार न मानता किमान आपल्या विचारांत, जाणिवांत रुतून बसलेल्या असमानतेला काढून फेकण्याची गरज आहे, अन् तिथूनच सुरुवात करण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकत्र्या शबाना आझमी यांनी व्यक्त केले.
'लोकमत वूमन समिट ’ मध्ये आझमी यांनी उपस्थितांशी संवाद साधत निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकला. ‘स्त्री सशक्तीकरण, स्त्री सुरक्षा किंवा अन्य कोणत्याही मुद्दय़ासाठी प्रत्येक वेळी सर्वानीच प्रत्यक्ष लढय़ात उतरण्याची गरज नसते. तसे अपेक्षितही नसते. मात्र, जे लोक समर्पित होऊन असे मुद्दे उचलून धरतात, झोकून देऊन काम करतात, त्याला पूर्ण समाजाने पाठिंबा देण्याची अत्यंत गरज आहे. त्या पाठिंब्यानेही प्रत्यक्ष काम करणा:यांना उभारी येते आणि आपला पाठिंबा असणो ही आपल्या बदलत्या जाणिवांचे द्योतक असते, असे सांगत आझमी यांनी बदलाच्या मंद वेगाविषयी आपल्या वडिलांनी सांगितलेला एक मंत्रही सांगितला. 
आझमी म्हणाल्या, ‘‘बदलाची प्रक्रिया ही किचकट असते. त्याचा वेग आपल्याला अपेक्षित असेल त्या पद्धतीने नसेलही; किंबहुना ते बदल आपण जिवंत असताना आपल्याला अनुभवता  येणारही नाहीत. मात्र, आपण जर प्रामाणिकपणो एखाद्या गोष्टीसाठी झटत असू, तर एक ना एक दिवस ते बदल घडतातच. त्यामुळे निराश न होता, आपण झटत राहायलाच हवे.
 
बदल म्हणजे लिटमस टेस्ट नव्हे
स्त्री सक्षमीकरणासाठी स्त्रियांनी बदलणो किंवा स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी पुरुषांनी बदलणो ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. बदल म्हणजे लिटमस टेस्ट नव्हे की टेस्ट केले की ‘रिझल्ट ’ मिळायला. शाश्वत बदलांसाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. मानसिकतेत आपल्या जाणिवांत बदल आणण्याची गरज आहे. शाश्वत बदलांसाठी वर्षानुवर्षाचा झगडा द्यावाच लागणार आहे. गेल्या अनेक वर्षाच्या प्रयत्नांमुळे आता काही प्रमाणात बदल दिसतच आहेत. त्यात अधिक भर घालण्याची गरज आहे.