शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

मोजणी न करता परतले महामार्ग विभागाचे अधिकारी डिमार्केशनला दिली सम्मती : शहराची हद्द असताना भूसंपादन मात्र जळगाव बुद्रुकच्या नावाने

By admin | Updated: January 29, 2016 22:27 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. भूमि अभिलेख कार्यालयाने १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली. जळगाव शहराची हद्द असताना जळगाव बुद्रुकच्या नावाने मोजणी करू देणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेत मोजणीस नकार दिल्याने पोलीस बंदोबस्तासह गेलेला फौजफाटा शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रिकाम्या हाताने परतला.

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. भूमि अभिलेख कार्यालयाने १८ शेतगट मालकांना शेतीच्या मोजणीसंदर्भात नोटीस दिली. जळगाव शहराची हद्द असताना जळगाव बुद्रुकच्या नावाने मोजणी करू देणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेत मोजणीस नकार दिल्याने पोलीस बंदोबस्तासह गेलेला फौजफाटा शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रिकाम्या हाताने परतला.
अमरावती ते चिखली, चिखली ते फागणे व फागणे ते नवापूर अशा तीन टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम होणार आहे. चौपदीकरणासाठी जळगाव जिल्‘ातून एकूण ३८० हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. पैकी २७५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. जळगाव शहरातून जाणार्‍या मार्गाचे भूसंपादन तसेच जमिनीची मोजणीचे काम बाकी आहे. त्यानुसार जळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शहर हद्दीतील १८ शेतमालकांना मोजणीसाठी नोटीस पाठविली आहे.

फौजफाट्यासह हजर झाले प्रातांधिकारी
शेतकर्‍यांचा विरोध गृहित धरत प्रातांधिकारी अभिजित भांडे, तहसीलदार गोविंद शिंदे हे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ममुराबाद शिवारात दाखल झाले. प्रातांधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्तासह भूसंपादनासाठी शेताची मोजणी करण्यासाठी आल्याचे माहीत झाल्यानंतर छबीलदास तुकाराम खडके, नीळकंठ दत्तात्रय खडके, ॲड.दीपकराज सोपान खडके, पंडित विठ्ठल तळेले, शशीकांत काळे, अनिल कोल्हे, गजानन तळेले, किशोर झोपे, घन:श्याम चौधरी, नामदेव खडके, यशवंत नेमाडे, शालीग्राम सपकाळे हे शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रातांधिकार्‍यांना शेताची मोजणी करू देण्यास नकार दिला.
शेतकर्‍यांनी दाखविले भूमि अभिलेखचे पत्र
जळगाव शहर (जळगाव बुद्रुक) येथील शेतजमिनीच्या संपादनाबाबत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांनी प्रातांधिकार्‍यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४ अंतर्गत शासन अथवा विभागीय आयुक्त यांच्याकडून रितसर अधिसूचना होऊन नामांतर होत नाही तोपर्यंत जमाबंदी अभिलेख व भूमि अभिलेखात गावाचे नावात बदल केल्यास सदर कृत्य अनधिकृत ठरेल असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रातांधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी या पत्राची छायांकित प्रत दाखविली. तसेच जमीन मोजणीसंदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर १७ रोजी कामकाज होणार असल्याने याचिकेवर निर्णय होत नाही, तो पर्यंत मोजणी करू नये असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला.