शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

काही न करताच ढोल कसले बडवता?

By admin | Updated: May 17, 2017 05:03 IST

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा मोठा डंका पिटण्याच्या भाजपाच्या योजनेवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा मोठा डंका पिटण्याच्या भाजपाच्या योजनेवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, वाढती बेरोजगारी, न पाळलेली आश्वासने आणि अनेक बाबतीत आलेले घोर अपयश याखेरीज मोदी सरकारकडे दाखविण्यासारखे आहे काय, मग ते नेमका कशाचा जल्लोष करीत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. सरकारने तीन वर्षांत केवळ लोकांचा विश्वासघात केला आहे, असे ते म्हणाले. राहुल टिष्ट्वटमध्ये म्हणतात, तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे. राहुल यांनी रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर यापूर्वीही सरकारवर हल्ला केला आहे. सरकारला एक वर्षात रोजगाराच्या एक कोटी संधी निर्माण करण्याचे आपले आश्वासन पाळता आलेले नाही. सरकारकडे दूरदृष्टी नसल्यामुळे तरुण वर्गात निराशा पसरली आहे, असेही ते म्हणाले. भाजपा केंद्रात आपल्या सरकारचे तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर मोदी उत्सवाचे आयोजन करीत आहे. तथापि, येथे मोदी म्हणजे पंतप्रधानांचे नाव नाही तर मेकिंग आॅफ डेव्हलपिंग इंडिया याचे ते लघुरूप आहे. या उत्सवाची सुरुवात २६ मे रोजी गुवाहाटी येथून होणार असून, १५ जून रोजी त्याची सांगता होईल. हा उत्सव देशभर आयोजित करण्यात येणार असून, यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात किमान एका सोहळ्याचे आयोजन होणार आहे.हा कसला आनंदोत्सव? तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे.