शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

काही न करताच ढोल कसले बडवता?

By admin | Updated: May 17, 2017 05:03 IST

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा मोठा डंका पिटण्याच्या भाजपाच्या योजनेवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा मोठा डंका पिटण्याच्या भाजपाच्या योजनेवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, वाढती बेरोजगारी, न पाळलेली आश्वासने आणि अनेक बाबतीत आलेले घोर अपयश याखेरीज मोदी सरकारकडे दाखविण्यासारखे आहे काय, मग ते नेमका कशाचा जल्लोष करीत आहेत, असा घणाघात त्यांनी केला. सरकारने तीन वर्षांत केवळ लोकांचा विश्वासघात केला आहे, असे ते म्हणाले. राहुल टिष्ट्वटमध्ये म्हणतात, तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे. राहुल यांनी रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावर यापूर्वीही सरकारवर हल्ला केला आहे. सरकारला एक वर्षात रोजगाराच्या एक कोटी संधी निर्माण करण्याचे आपले आश्वासन पाळता आलेले नाही. सरकारकडे दूरदृष्टी नसल्यामुळे तरुण वर्गात निराशा पसरली आहे, असेही ते म्हणाले. भाजपा केंद्रात आपल्या सरकारचे तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर मोदी उत्सवाचे आयोजन करीत आहे. तथापि, येथे मोदी म्हणजे पंतप्रधानांचे नाव नाही तर मेकिंग आॅफ डेव्हलपिंग इंडिया याचे ते लघुरूप आहे. या उत्सवाची सुरुवात २६ मे रोजी गुवाहाटी येथून होणार असून, १५ जून रोजी त्याची सांगता होईल. हा उत्सव देशभर आयोजित करण्यात येणार असून, यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात किमान एका सोहळ्याचे आयोजन होणार आहे.हा कसला आनंदोत्सव? तरुण नोकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सीमेवर सैनिकांचा बळी जात आहे, अशात सरकार नेमके कशाचा आनंदोत्सव साजरा करीत आहे.