शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यातून पदाधिकार्‍यांचा भ्रमनिराश नियमांच्या काटेकोर पालनाने घोडेबाजाराला लगाम

By admin | Updated: May 21, 2014 00:00 IST

अकोला : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये पदाधिकार्‍यांकडून होणार्‍या घोडेबाजाराला यावर्षी लगाम लागला. शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया रद्द होणे आणि बदली करताना अधिकार्‍यांनी नियमावर बोट ठेवल्याने पदाधिकार्‍यांचा पुरता भ्रमनिराश झाला.

अकोला : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये पदाधिकार्‍यांकडून होणार्‍या घोडेबाजाराला यावर्षी लगाम लागला. शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया रद्द होणे आणि बदली करताना अधिकार्‍यांनी नियमावर बोट ठेवल्याने पदाधिकार्‍यांचा पुरता भ्रमनिराश झाला. जिल्हा परिषदेतील वर्ग क आणि ड संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या १९ आणि २0 मे असे दोन दिवस करण्यात आल्या. यात विविध विभागांचा समावेश होता. पहिल्या दिवशी कर्मचार्‍यांची संख्या कमी असलेल्या विभागातील कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया आटोपली. मंगळवारी आरोग्य, पंचायत आणि सामान्य प्रशासन या तीन प्रमुख विभागातील ९४ कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या. यात बहुतांश बदल्या या विनंतीवरून असल्याने जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी त्यात हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकार्‍यांनी नियमांवर बोट ठेवत कोणत्याही पदाधिकार्‍याला बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे सर्वच पदाधिकार्‍यांचा भ्रमनिराश झाला. सर्वात मोठा घोडेबाजार शिक्षकांच्या बदल्यांमधून होतो. मात्र, समायोजनापूर्वी शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविता येत नसल्याने ती रद्द करण्यात आली. त्यामुळे येथेही पदाधिकार्‍यांच्या पदरी निराशाच आली. 

** ९४ कर्मचार्‍यांच्या बदल्याजिल्हा परिषदेतील आरोग्य, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागातील ९४ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. पंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकार्‍यांच्या २, ग्रामविकास अधिकार्‍यांच्या २ आणि ग्रामसेवकांच्या ८ बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक ५, आयोग्य सहायक २, औषध निर्माण अधिकारी, स्वास्थ अभ्यंगता यांची प्रत्येकी १ तर आरोग्य सेविकांच्या ३ बदल्या करण्यात आल्या. एका आयोग्य पर्यवेक्षकाचीही बदली केली. सामान्य प्रशासन विभागांतर्गत कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍याची आपसी विनंती बदली करण्यात आली. विस्तार अधिकारी सांख्यिकी या संवर्गातील १, वरिष्ठ सहायक १४, कनिष्ठ सहायक २७, वाहन चालक १ आणि परिचरांच्या २५ बदल्या करण्यात आल्या.

** दहा वर्ष पूर्ण न झालेल्या कर्मचार्‍यांच्याही प्रशासकीय बदल्याप्रशासकीय बदलीसाठी मुख्यालयातील सलग १0 वर्षांच्या सेवेचा काळ निर्धारित करण्यात आला होता. त्यामुळे त्यापेक्षा कमी सेवा असलेले कर्मचारी बदलीस पात्र नसल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात बदली करताना अशा कर्मचार्‍यांच्या माघारीच त्यांची बदली करण्यात आली. बदली करताना विश्वासात घेण्यात न आल्याने या कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर होता.