शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

'हे हिवाळी अधिवेशन खूपच महत्वाचे'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 10:33 IST

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विजयासह सत्ता स्थापन केली होती. मात्र, पहिल्यांदाच एनडीएतील गेल्या 30 वर्षांपासूनचा एकमेव हिंदुत्ववादी मित्रपक्ष शिवसेना बाहेर पडला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आज हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाची वैशिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहेत. 

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला. हे अधिवेशन यंदाचे शेवटचे आहे. तसेच महत्वाचेही आहे. कारण राज्यसभेचे हे 250 वे अधिवेशन आहे. तसेच आपल्या संविधानाला येत्या 26 सारखेला 70 वर्षे पूर्ण होत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांती मी सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची संधी दिली आहे. गेल्या वेळचे अधिवेशन त्यांच्या सहकार्यामुळे चांगले झालेय. यावेळीही सर्व खासदारांनी चांगली चर्चा, विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे, असेही मोदी म्हणाले. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला अधिक अधिकार यासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत झाली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे विधेयकही संमत केले होते. नागरिकत्व विधेयक संमत करून घेण्याबरोबरच दोन वटहुकुमांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकार या वेळी प्रयत्नशील असेल. नव्या व देशी उत्पादक कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात कपात करणे तसेच ई-सिगारेट व सदृश उत्पादनांच्या विक्री, उत्पादन व साठवणुकीवर बंदी घालणे असे दोन वटहुकूम सप्टेंबर महिन्यात जारी करण्यात आले होते.

यापैकी काही विधेयकांची संशोधन विधेयके संमत करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करणार आहेत. मात्र, राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने हे अधिवेशन तेवढेच गाजणार आहे. त्यातच शिवसेना एनडीएच्या बाजुने मतदान करते की विरोधात हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा