शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

'हे हिवाळी अधिवेशन खूपच महत्वाचे'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 10:33 IST

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विजयासह सत्ता स्थापन केली होती. मात्र, पहिल्यांदाच एनडीएतील गेल्या 30 वर्षांपासूनचा एकमेव हिंदुत्ववादी मित्रपक्ष शिवसेना बाहेर पडला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आज हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाची वैशिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहेत. 

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला. हे अधिवेशन यंदाचे शेवटचे आहे. तसेच महत्वाचेही आहे. कारण राज्यसभेचे हे 250 वे अधिवेशन आहे. तसेच आपल्या संविधानाला येत्या 26 सारखेला 70 वर्षे पूर्ण होत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांती मी सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची संधी दिली आहे. गेल्या वेळचे अधिवेशन त्यांच्या सहकार्यामुळे चांगले झालेय. यावेळीही सर्व खासदारांनी चांगली चर्चा, विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे, असेही मोदी म्हणाले. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला अधिक अधिकार यासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत झाली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे विधेयकही संमत केले होते. नागरिकत्व विधेयक संमत करून घेण्याबरोबरच दोन वटहुकुमांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकार या वेळी प्रयत्नशील असेल. नव्या व देशी उत्पादक कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात कपात करणे तसेच ई-सिगारेट व सदृश उत्पादनांच्या विक्री, उत्पादन व साठवणुकीवर बंदी घालणे असे दोन वटहुकूम सप्टेंबर महिन्यात जारी करण्यात आले होते.

यापैकी काही विधेयकांची संशोधन विधेयके संमत करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करणार आहेत. मात्र, राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने हे अधिवेशन तेवढेच गाजणार आहे. त्यातच शिवसेना एनडीएच्या बाजुने मतदान करते की विरोधात हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा