शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'हे हिवाळी अधिवेशन खूपच महत्वाचे'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 10:33 IST

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विजयासह सत्ता स्थापन केली होती. मात्र, पहिल्यांदाच एनडीएतील गेल्या 30 वर्षांपासूनचा एकमेव हिंदुत्ववादी मित्रपक्ष शिवसेना बाहेर पडला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आज हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाची वैशिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहेत. 

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी यांनी हा संदेश दिला. हे अधिवेशन यंदाचे शेवटचे आहे. तसेच महत्वाचेही आहे. कारण राज्यसभेचे हे 250 वे अधिवेशन आहे. तसेच आपल्या संविधानाला येत्या 26 सारखेला 70 वर्षे पूर्ण होत आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांती मी सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची संधी दिली आहे. गेल्या वेळचे अधिवेशन त्यांच्या सहकार्यामुळे चांगले झालेय. यावेळीही सर्व खासदारांनी चांगली चर्चा, विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे, असेही मोदी म्हणाले. 

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी, राष्ट्रीय तपास यंत्रणेला अधिक अधिकार यासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत झाली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे तसेच जम्मू-काश्मीर, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे विधेयकही संमत केले होते. नागरिकत्व विधेयक संमत करून घेण्याबरोबरच दोन वटहुकुमांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकार या वेळी प्रयत्नशील असेल. नव्या व देशी उत्पादक कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात कपात करणे तसेच ई-सिगारेट व सदृश उत्पादनांच्या विक्री, उत्पादन व साठवणुकीवर बंदी घालणे असे दोन वटहुकूम सप्टेंबर महिन्यात जारी करण्यात आले होते.

यापैकी काही विधेयकांची संशोधन विधेयके संमत करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करणार आहेत. मात्र, राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने हे अधिवेशन तेवढेच गाजणार आहे. त्यातच शिवसेना एनडीएच्या बाजुने मतदान करते की विरोधात हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा