शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

यंदा खाद्यतेलांच्या आयातीमध्ये होणार वाढ

By admin | Updated: June 26, 2014 22:06 IST

यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 
अल निनोचा फटका भारताला बसत असून त्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे देशातील तेलबियांच्या उत्पादनात घट होणार आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या उत्पादनालाही बसणार आहे. देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी सरकारला खाद्यतेलाची आयात करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगितले जाते.
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया(असोचेम)ने याबाबत केलेल्या एका अभ्यासामधून हा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती सरचिटणीस डी. एस.रावत यांनी दिली. वाढत्या उत्पन्नामुळे देशातील खाद्यतेलाचा वापर सुमारे 15 टक्क्यांनी वाढत असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. देशातील खाद्यतेलाच्या एकूण मागणीपैकी सुमारे निम्मी मागणी ही आयातीमधून पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन 2क्12-13 मध्ये 11.2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खाद्यतेलाची आयात केली गेली होती. नंतरच्या वर्षात तेलबियांचे उत्पादन वाढल्याने आयातीचे प्रमाण कमी होऊन 9.3 अब्ज अमेरिकन डॉलरवर आले आहे. चालू वर्षात पुन्हा आयात वाढून 14 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4भारतातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश ही तेलबिया उत्पादक प्रमुख राज्ये आहेत.
4या राज्यांमधील पाऊस सुमारे 15 टक्क्यांनी कमी होणार असल्यामुळे तेलबियांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
 
4तेलबियांचे उत्पादन घटल्यामुळे खाद्यतेलांचे उत्पादनही कमी होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात आयात करावी लागणार आहे.
4सोयाबीन,मोहरी, शेंगदाणो, सूर्यफूल,सरसो या भारतातील प्रमुख तेलबिया आहे. याशिवाय तीळ, करडई,खुरासणी आणि एरंडी यापासूनही काही प्रमाणात तेलाची निर्मिती होते.
 
4तेलबियांना मिळणारी किंमत ही सातत्याने बदलत असते आणि ब:याचदा ती कमी असल्याने शेतकरी तेलबियांच्या उत्पादनाला फारसा उत्सुक नसल्याचे चित्र दिसून येते.