शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खाद्यतेलांच्या आयातीमध्ये होणार वाढ

By admin | Updated: June 26, 2014 22:06 IST

यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 
अल निनोचा फटका भारताला बसत असून त्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे देशातील तेलबियांच्या उत्पादनात घट होणार आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या उत्पादनालाही बसणार आहे. देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी सरकारला खाद्यतेलाची आयात करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगितले जाते.
असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया(असोचेम)ने याबाबत केलेल्या एका अभ्यासामधून हा निष्कर्ष निघाला असल्याची माहिती सरचिटणीस डी. एस.रावत यांनी दिली. वाढत्या उत्पन्नामुळे देशातील खाद्यतेलाचा वापर सुमारे 15 टक्क्यांनी वाढत असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. देशातील खाद्यतेलाच्या एकूण मागणीपैकी सुमारे निम्मी मागणी ही आयातीमधून पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन 2क्12-13 मध्ये 11.2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या खाद्यतेलाची आयात केली गेली होती. नंतरच्या वर्षात तेलबियांचे उत्पादन वाढल्याने आयातीचे प्रमाण कमी होऊन 9.3 अब्ज अमेरिकन डॉलरवर आले आहे. चालू वर्षात पुन्हा आयात वाढून 14 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4भारतातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश ही तेलबिया उत्पादक प्रमुख राज्ये आहेत.
4या राज्यांमधील पाऊस सुमारे 15 टक्क्यांनी कमी होणार असल्यामुळे तेलबियांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
 
4तेलबियांचे उत्पादन घटल्यामुळे खाद्यतेलांचे उत्पादनही कमी होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक प्रमाणात आयात करावी लागणार आहे.
4सोयाबीन,मोहरी, शेंगदाणो, सूर्यफूल,सरसो या भारतातील प्रमुख तेलबिया आहे. याशिवाय तीळ, करडई,खुरासणी आणि एरंडी यापासूनही काही प्रमाणात तेलाची निर्मिती होते.
 
4तेलबियांना मिळणारी किंमत ही सातत्याने बदलत असते आणि ब:याचदा ती कमी असल्याने शेतकरी तेलबियांच्या उत्पादनाला फारसा उत्सुक नसल्याचे चित्र दिसून येते.