शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी का घालू नये ? - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: March 24, 2017 18:35 IST

कोणत्याही प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीच्या निवडणूक लढण्यावर आजन्म बंदी का घालण्यात येऊ नये अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - गुन्हेगारांच्या निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून उत्तर मागितलं आहे. न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करत उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. कोणत्याही प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीच्या निवडणूक लढण्यावर आजन्म बंदी का घालण्यात येऊ नये अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे. याप्रकरणी 18 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. 
 
महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या न्यायालयाकडून दोषी आढळलेल्या व्यक्तींच्या निवडणूक लढवण्यावर घालण्यात आलेली बंदी सहा वर्ष आहे. याच मुद्याला आव्हान देत दिल्ली भाजपा प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील वकिल अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेतून त्यांनी दोषी आढळलेल्यांवर आजन्म बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासोबतच अश्विनी उपाध्याय यांनी लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी इतर कर्मचा-यांशी संबंधित फौजदारी खटल्यांना एका वर्षात निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय गठीत केलं जावं अशी मागणी केली आहे. 
 
या दोन्ही मुद्यांवर निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत सहमती दर्शवली आहे. राजकारणात गुन्हेगारांचा प्रवेश रोखण्यासाठी हे असं करणं गरजेचं असल्याचं आयोगाने सांगितलं आहे. निवडणूक लढण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता आणि कमाल वय मर्यादाच्या मागणीवर हा मुद्दा कायद्याच्या चौकटीत येत असून यासाठी घटनेत दुरुस्ती करणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. 
 
अत्यंत गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी अशी शिफारस निवडणूक आयोगानेही केली होती. आयोगाने कायदा मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात खोटे शपथपत्र देणा-या उमेदवारांनाही अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. गंभीर गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या आमदार व खासदारांना तत्काळ अपात्र घोषित करावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने आपल्या शिफारशी सरकारकडे पाठवल्या होत्या.