शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गोरक्षकांवर बंदी का नको - सर्वोच न्यायालय

By admin | Updated: April 7, 2017 12:39 IST

कायदा हातात घेणा-या गोरक्षकांवर बंदी का घालू नये ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सहा राज्यांना विचारला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - गोरक्षकांवर बंदी घालण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राजस्थानसह सहा राज्यांना नोटीस बजावली. या राज्यांना तीन आठवडयांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. अल्वर येथे कथित गोरक्षकांनी  पेहलू खान या मुस्लिमाची तस्कर समजून हत्या केली. या हत्येसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारकडून तीन आठवडयांच्या आता उत्तर मागितले आहे. 
 
यासंबंधी पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. अल्वर येथे झालेल्या घटनेवरुन राजकारण तापले आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक झाली आहे. कायदा हातात घेणा-या गोरक्षकांवर बंदी का घालू नये ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सहा राज्यांना विचारला आहे. गोहत्या आणि हिंसाचाराच्या घटनांसंबंधी काँग्रेस नेते शेहझाद पूनावाला यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 
 
अल्वर येथे गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत पेहलू खान यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचाही पूनावाला यांनी जनहित याचिकेत उल्लेख केला आहे. गोरक्षकांवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे गोरक्षकांवर बंदी घालावी अशी पूनावाला यांची मागणी आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये सरकार गोरक्षकांना पाठिशी घालत असल्यामुळे त्यांना बळ मिळत असल्याचा आरोप पूनावाला यांनी केला आहे. सोशल मीडियामधून पसरणा-या अफवांवरही लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.