शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ठाकरे सरकार बहुमत चाचणीला का घाबरले? शिंदे गटाचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 06:51 IST

शिंदे गटाचा युक्तिवाद, आमदारांना अपात्र घोषित करता येणार नाही

नवी दिल्ली : विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांनी दिलेला प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी न स्वीकारल्याने महाराष्ट्रातील स्थिती उद्भवली आहे. राजकीय पक्षातील असहमतीच्या तत्त्वामुळे लोकशाही अधिक प्रगल्भ व समृद्ध होईल. राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीचा वापर करून आमदारांना अपात्र घोषित करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी शिंदे गटाने राज्यघटनेतील १०व्या अनुसूची व नबाम रेबिया प्रकरणाचा वापर करण्याला तीव्र विरोध दर्शविला. हा खटला सात सदस्यीय घटनापीठाकडे जाईल काय? हे गुरुवारी स्पष्ट होईल.

बुधवारी पुन्हा सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे सुनावणी झाली. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे व नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात नबाम रेबिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय व राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीचा संदर्भ आला आहे. यावर दोन्ही विधिज्ञांनी चार तास युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी प्रामुख्याने चार मुद्दे मांडले.

साळवे यांचा युक्तिवाद 

अपात्रतेची तरतूद कुलूप लावलेले धान्याचे कोठारपक्षांतर विरोधी कायद्यात अपात्रतेची तरतूद म्हणजे एक धान्याचे कोठार आहे. कोठाराला बाहेरून कुलूप लावले आहे. पक्षांतर विरोधी कायदा हा आपल्याच नेत्यांचा विश्वास गमावलेल्या नेत्यांसाठी नाही. 

पक्षांतर बंदी कायदा लागू नाही  पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही फुटून निघालेल्या गटाला दुसऱ्या पक्षात किंवा नव्या पक्षाची स्थापना करावी लागते. या प्रकरणात हा कायदा लागू होत नाही. 

नबाम रेबिया निकालाचा संबंध नाहीया खटल्यास नबाम रेबिया प्रकरणाचा दाखल द्यायचा असेल तर ठाकरे गटाने आधी ही याचिका मागे घ्यायला पाहिजे. उपाध्यक्षांना हटविण्यासाठी नोटीस दिली परंतु त्यावर मतदान झाले नाही. 

अपात्रतेचा मुद्दा गैरलागू  शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गैरलागू आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिला. त्यास सामोरे गेले असते तर हा प्रश्न उद्भवला असता.

कौल यांचा युक्तिवाद 

चाचणीला सामाेरे गेले असते तर... राज्यपालांनी ठाकरेंना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. परंतु ठाकरे यांनी राजीनामा दिला. बहुमत चाचणीला ठाकरे सामोरे गेले असते तर पुढील प्रश्न निर्माण झाले नसते.पक्षांतर्गत असहमती महत्त्वाची  पक्षांतर्गत असहमती हे लोकशाहीचे महत्त्वपूर्ण अंग आहे. पक्षाच्या नेतृत्वात बदल केल्याने राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नाही.लोकशाहीचा खून नाही  शिवसेनेच्या काही आमदारांनी असहमती दर्शविल्यानंतर त्यांनी लोकशाहीचा खून केला, असे चित्र निर्माण करण्यात आले. परंतु हे खरे नाही. शिवसेनेतच असंतोष होता.१०वी अनुसूची गैरलागू  राज्यघटनेतील १०व्या अनुसूचीची तरतूद या ठिकाणी लागू होत नाही. काहींनी असहमती दर्शवून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेतच आहे.

असहमतीचे तत्त्व प्रगल्भ लोकशाहीचा आत्मा

सरन्यायाधीश काय म्हणाले?सर्व युक्तिवादात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी मुद्दे उपस्थित केले. युक्तिवादादरम्यान यावर वकिलांकडून स्पष्टीकरण मागितले.n या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दोन आदेश जूनमध्ये दिले. पहिल्यांदा अपात्रतेची नोटीस बजावलेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांना १२ जुलैपर्यंत उत्तर देण्याची मुभा दिली व दुसरे म्हणजे बहुमत चाचणीच्या राज्यपालांच्या आदेशाला स्थगनादेश दिला नाही. n नबाम रेबिया प्रकरणाचा संदर्भ या ठिकाणी योग्य आहे की, अयोग्य आहे. तुम्ही कोणत्या बाजूने आहात? हे स्पष्ट करा, असे निर्देश त्यांनी शिंदे गटाच्या वकिलांना दिले. n पक्षांतर बंदीच्या कायद्याचा संदर्भ खरेच कठीण आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आमदार मुक्तपणे गेल्याचे आपण महाराष्ट्रात पाहिले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे