शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

...मग कमनशीबींना मतदान का करायचे ? - मोदी

By admin | Updated: February 1, 2015 17:54 IST

माझ्या नशीबामुळे देशवासीयांच्या खिशात पैशांची बचत होणार असेल तर मग कमनशीबींना मतदान का करायचे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - मी सत्तेवर आल्यापासून पेट्रोल व डिझेलचे दर सातत्त्याने कमी होत आहेत. मी नशीबवाला असल्याने कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचे विरोधक म्हणतात. पण जर माझ्या नशीबामुळे देशवासीयांच्या खिशात पैशांची बचत होणार असेल तर मग कमनशीबींना मतदान का करायचे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.  तर पंतप्रधानांनी केजरीवाल यांचा कमनशीबी म्हणून उल्लेख करणे हे डर्टी पॉलिटीक्स असून आता दिल्लीकरच यावर प्रत्युत्तर देतील अशी प्रतिक्रिया आपचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिली आहे. 
रविवारी भर थंडीतही दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत प्रचारसभांचा धडाका लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे प्रचारसभा घेतली. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले होते. आता ते दोघेही दररोज भाजपावर खोटे आरोप करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. टीव्हीवर दिसण्यासाठी पक्ष स्थापन केले जात नाही. सरकार चालवणे ही महत्त्वाची जबाबदारी असून तिथून पळ काढता येत नाही असा चिमटा मोदींनी केजरीवाल यांना काढला. तर गेली अनेक वर्ष गरिबांना गरिब ठेवून राजकारण केले जात आहे असा आरोप करत त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. 
 
मोदींनी दिलेल्या आश्वासनांच काय ? - गांधी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील बदरपूर येथे रविवारी प्रचारसभा घेतली. काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु, तरुणांना रोजगार देऊ अशी आश्वासनं मोदींनी दिली होती. या आश्वासनांचे काय झाले असा खोचक सवाल सोनिया गांधी यांनी विचारला. तर काँग्रेसने चांगल्या प्रशासनासाठी केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. मात्र ते जबाबदारी सोडून पळून गेले अशी आठवण त्यांनी करुन दिले. आम आदमी पक्ष दिखाव्याचे राजकारण करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. 
 
मोदी सरकारच्या काळात बलात्कार वाढले - केजरीवाल 
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. २०१३ मध्ये दिल्लीत बलात्काराच्या १,५७१ घटना घडल्या होत्या. तर २०१४ मध्ये हेच प्रमाण २,०६९ पर्यंत पोहोचले असा दावा केजरीवाल यांनी केला. मोदी सरकारच्या काळात बलात्काराच्या घटनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून ओबामांच्या सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही आता काढले जात असल्याचे समजते असा आरोपही त्यांनी केला.