शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मी एकटी का फिरु शकत नाही ? बंगळुरुमधील तरुणीचा सवाल

By admin | Updated: January 6, 2017 12:30 IST

बंगळुरूमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणातील तरुणीने 'मी एकट्याने का फिरू शकत नाही?', असा प्रश्न उपस्थित केला आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - बंगळुरूमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणातील तरुणीने 'मी एकट्याने का फिरू शकत नाही?', असा प्रश्न उपस्थित केला आहे.  'बंगळुरूमध्ये माझा जन्म झाला. मोठ्या भावासोबत एका उदारमतवादी परिवारात मी वाढले. वयाच्या आठव्या वर्षी मला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य मिळाले, शहरातील गल्ल्यांमध्ये मी संध्याकाळी उशीरापर्यंत खेळ खेळले, डान्स क्लाससाठी प्रवास केला आणि हो हे मी सर्व स्वतःच्या मर्जीने केले', असं या पीडित तरुणीने सांगितले.   
 
'बंगळुरूमध्ये मोठे होतानाचा अनुभव चांगला नाही. अशा अनेक घटना लक्षात आहे की, ज्यावेळी माझा पाठलाग केला गेला, छेडछाड करण्यात आली, फोनवर घाणेरड्या लोकांचे फोन आणि मेसेज आले आणि बरंच काही...', अशा अनुभवलेल्या सर्व वाईट गोष्टी तरुणीने व्यक्त केल्या असून त्या संपात, चीड निर्माण करणा-या आहेत.  
(VIDEO : बंगळुरु छेडछाड घटनेवरुन अक्षय कुमारचा संताप अनावर)
 
'स्वातंत्र्यासोबत मी स्वरक्षणाचेही धडे घेतले आहेत, मी मिक्स्ड मार्शल आर्ट्स शिकले असून स्थानिक भाषाही शिकले आहे, मात्र जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा यापैकी कोणतीही गोष्ट कामी येत नाही', असंही पीडित तरुणीने सांगितलं आहे.
'शहरातील पुरुष असे स्वतःला असे समजतात, की ते काहीही करू शकतात. काही दिवसांपूर्वी महिला ड्रायव्हरसोबत ज्याप्रकारे पुरुषांनी वर्तन केले त्यावरुन हे मत पक्क झाले आहे. माझ्यासोबतही एक छोटीशी घटना घडली. चारही बाजूंनी मला काही जणांनी घेरले, यात लोकांनी मलाच दोषी ठरवले. त्यांनी काहीही पाहिले नाही, तरिही मला चुकीचे ठरवले. ही घटना माझ्या कॉलेज परिसरात घडली होती', अशी आठवण तिने सांगितली.  
 
(VIDEO : बंगळुरु छेडछाड प्रकरण - सीसीटीव्हीत कैद झालं नीच कृत्य)
 
'मी हेदेखील अनुभवले आहे की, एकट्या तरुणीला लोकांनी घेरले तर तिचे चांगले मित्रही काही करु शकत नाहीत. दरम्यान जोपर्यंत महिलेला पुरुषाकडून मदत मिळत नाही तोपर्यंत लोक तिला कस्पटासमान समजतात'.
 
'पोलिसांकडूनही काही खास मदत होत नाही, त्यांनी मला सांगितले की हे प्रकरण मिटवून टाका', असा आरोपदेखील पीडित मुलीने केला आहे. दरम्यान, कॉलेज परिसरातील घटना दिवसाढवळ्या घडली होती, असेही तिने सांगितले. 
बंगळुरू शहरातील लोकं जास्त हिंसक होत आहेत, असेही तिने म्हटले. महिलांचा धाडसीपणा पुरुषांना आक्रमक बनवत असून ते महिलांना स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये काही समानता नाही, अशी खंतही तिने व्यक्त केली आहे. 
 
सरकार, आमचं कुटुंब आणि नागरिकांनी बदल होतो यावर विश्वास ठेवत या वाईट प्रवृत्तींचा नाश करणे गरजेचे आहे. पुरुषांनी आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. लैंगिक समानतेचं महत्व सांगणारं शिक्षण देणंही गरजेचं असल्याचं या तरुणीने सांगितलं आहे.