शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

मी एकटी का फिरु शकत नाही ? बंगळुरुमधील तरुणीचा सवाल

By admin | Updated: January 6, 2017 12:30 IST

बंगळुरूमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणातील तरुणीने 'मी एकट्याने का फिरू शकत नाही?', असा प्रश्न उपस्थित केला आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - बंगळुरूमध्ये झालेल्या छेडछाड प्रकरणातील तरुणीने 'मी एकट्याने का फिरू शकत नाही?', असा प्रश्न उपस्थित केला आहे.  'बंगळुरूमध्ये माझा जन्म झाला. मोठ्या भावासोबत एका उदारमतवादी परिवारात मी वाढले. वयाच्या आठव्या वर्षी मला प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य मिळाले, शहरातील गल्ल्यांमध्ये मी संध्याकाळी उशीरापर्यंत खेळ खेळले, डान्स क्लाससाठी प्रवास केला आणि हो हे मी सर्व स्वतःच्या मर्जीने केले', असं या पीडित तरुणीने सांगितले.   
 
'बंगळुरूमध्ये मोठे होतानाचा अनुभव चांगला नाही. अशा अनेक घटना लक्षात आहे की, ज्यावेळी माझा पाठलाग केला गेला, छेडछाड करण्यात आली, फोनवर घाणेरड्या लोकांचे फोन आणि मेसेज आले आणि बरंच काही...', अशा अनुभवलेल्या सर्व वाईट गोष्टी तरुणीने व्यक्त केल्या असून त्या संपात, चीड निर्माण करणा-या आहेत.  
(VIDEO : बंगळुरु छेडछाड घटनेवरुन अक्षय कुमारचा संताप अनावर)
 
'स्वातंत्र्यासोबत मी स्वरक्षणाचेही धडे घेतले आहेत, मी मिक्स्ड मार्शल आर्ट्स शिकले असून स्थानिक भाषाही शिकले आहे, मात्र जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा यापैकी कोणतीही गोष्ट कामी येत नाही', असंही पीडित तरुणीने सांगितलं आहे.
'शहरातील पुरुष असे स्वतःला असे समजतात, की ते काहीही करू शकतात. काही दिवसांपूर्वी महिला ड्रायव्हरसोबत ज्याप्रकारे पुरुषांनी वर्तन केले त्यावरुन हे मत पक्क झाले आहे. माझ्यासोबतही एक छोटीशी घटना घडली. चारही बाजूंनी मला काही जणांनी घेरले, यात लोकांनी मलाच दोषी ठरवले. त्यांनी काहीही पाहिले नाही, तरिही मला चुकीचे ठरवले. ही घटना माझ्या कॉलेज परिसरात घडली होती', अशी आठवण तिने सांगितली.  
 
(VIDEO : बंगळुरु छेडछाड प्रकरण - सीसीटीव्हीत कैद झालं नीच कृत्य)
 
'मी हेदेखील अनुभवले आहे की, एकट्या तरुणीला लोकांनी घेरले तर तिचे चांगले मित्रही काही करु शकत नाहीत. दरम्यान जोपर्यंत महिलेला पुरुषाकडून मदत मिळत नाही तोपर्यंत लोक तिला कस्पटासमान समजतात'.
 
'पोलिसांकडूनही काही खास मदत होत नाही, त्यांनी मला सांगितले की हे प्रकरण मिटवून टाका', असा आरोपदेखील पीडित मुलीने केला आहे. दरम्यान, कॉलेज परिसरातील घटना दिवसाढवळ्या घडली होती, असेही तिने सांगितले. 
बंगळुरू शहरातील लोकं जास्त हिंसक होत आहेत, असेही तिने म्हटले. महिलांचा धाडसीपणा पुरुषांना आक्रमक बनवत असून ते महिलांना स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये काही समानता नाही, अशी खंतही तिने व्यक्त केली आहे. 
 
सरकार, आमचं कुटुंब आणि नागरिकांनी बदल होतो यावर विश्वास ठेवत या वाईट प्रवृत्तींचा नाश करणे गरजेचे आहे. पुरुषांनी आपल्या विचारांमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. लैंगिक समानतेचं महत्व सांगणारं शिक्षण देणंही गरजेचं असल्याचं या तरुणीने सांगितलं आहे.