शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 06:25 IST

गलवान खोऱ्यातील संघर्षाला वर्ष पूर्ण; २० जवान झाले होते शहीद

- शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात २० सैनिकांना हौतात्म्य मिळाले. त्यानंतरही महत्त्वाच्या ठिकाणांवर चीनचे सैनिक बसले असून मोदी सरकार मौन बाळगून आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून १५ जून, २०२० रोजी झालेल्या त्या संघर्षाची आठवण करून देत मागणी केली की, मोदी सरकारने देशाला विश्वासात घ्यावे म्हणजे देश आणि सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना खात्री वाटेल की, सरकार म्हणते तसे वागत आहे.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी १५-१६ जून रोजीच्या त्या घटनेवर व्हिडिओसह ट्वीटरवर भाष्य केले. ते म्हणाले, “ त्या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत. सरकार जनतेला जबाबदार आहे.” पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, “आमच्या २० योद्ध्यांना हुतात्मा होऊन एक वर्ष झाले. चीनचा आजही आमच्या जमिनीवर कब्जा आहे. मोदी सरकार देशाच्या संरक्षणात अपयशी ठरले आहे.” पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी यांच्यावर टीका करताना आठवण करून दिली की, मोदी म्हणाले  होते की “कोणी घुसखोरी केलेली नाही.” 

‘सर्वोच्च बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहील’n    पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी १५ व १६ जून रोजी चीनच्या सैन्याशी लढताना हुतात्मा झालेल्या २० भारतीय जवानांना लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांंनी मंगळवारी आदरांजली अर्पण केली. n    जनरल नरवणे म्हणाले,“चीनच्या अभूतपूर्व अशा आक्रमणात जवानांनी अतिशय कठीण अशा उंच भागात लढून केलेले सर्वोच्च बलिदान देशाच्या कायम स्मरणात कोरलेले राहील.” जवळपास पाच दशकांनंतर चीनशी प्रथमच झालेला हा अत्यंत हिंसक असा संघर्ष होता.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख