शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 06:25 IST

गलवान खोऱ्यातील संघर्षाला वर्ष पूर्ण; २० जवान झाले होते शहीद

- शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात २० सैनिकांना हौतात्म्य मिळाले. त्यानंतरही महत्त्वाच्या ठिकाणांवर चीनचे सैनिक बसले असून मोदी सरकार मौन बाळगून आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून १५ जून, २०२० रोजी झालेल्या त्या संघर्षाची आठवण करून देत मागणी केली की, मोदी सरकारने देशाला विश्वासात घ्यावे म्हणजे देश आणि सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना खात्री वाटेल की, सरकार म्हणते तसे वागत आहे.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी १५-१६ जून रोजीच्या त्या घटनेवर व्हिडिओसह ट्वीटरवर भाष्य केले. ते म्हणाले, “ त्या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत. सरकार जनतेला जबाबदार आहे.” पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, “आमच्या २० योद्ध्यांना हुतात्मा होऊन एक वर्ष झाले. चीनचा आजही आमच्या जमिनीवर कब्जा आहे. मोदी सरकार देशाच्या संरक्षणात अपयशी ठरले आहे.” पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी यांच्यावर टीका करताना आठवण करून दिली की, मोदी म्हणाले  होते की “कोणी घुसखोरी केलेली नाही.” 

‘सर्वोच्च बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहील’n    पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी १५ व १६ जून रोजी चीनच्या सैन्याशी लढताना हुतात्मा झालेल्या २० भारतीय जवानांना लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांंनी मंगळवारी आदरांजली अर्पण केली. n    जनरल नरवणे म्हणाले,“चीनच्या अभूतपूर्व अशा आक्रमणात जवानांनी अतिशय कठीण अशा उंच भागात लढून केलेले सर्वोच्च बलिदान देशाच्या कायम स्मरणात कोरलेले राहील.” जवळपास पाच दशकांनंतर चीनशी प्रथमच झालेला हा अत्यंत हिंसक असा संघर्ष होता.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख