शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 06:25 IST

गलवान खोऱ्यातील संघर्षाला वर्ष पूर्ण; २० जवान झाले होते शहीद

- शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात २० सैनिकांना हौतात्म्य मिळाले. त्यानंतरही महत्त्वाच्या ठिकाणांवर चीनचे सैनिक बसले असून मोदी सरकार मौन बाळगून आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून १५ जून, २०२० रोजी झालेल्या त्या संघर्षाची आठवण करून देत मागणी केली की, मोदी सरकारने देशाला विश्वासात घ्यावे म्हणजे देश आणि सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना खात्री वाटेल की, सरकार म्हणते तसे वागत आहे.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी १५-१६ जून रोजीच्या त्या घटनेवर व्हिडिओसह ट्वीटरवर भाष्य केले. ते म्हणाले, “ त्या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत. सरकार जनतेला जबाबदार आहे.” पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, “आमच्या २० योद्ध्यांना हुतात्मा होऊन एक वर्ष झाले. चीनचा आजही आमच्या जमिनीवर कब्जा आहे. मोदी सरकार देशाच्या संरक्षणात अपयशी ठरले आहे.” पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी यांच्यावर टीका करताना आठवण करून दिली की, मोदी म्हणाले  होते की “कोणी घुसखोरी केलेली नाही.” 

‘सर्वोच्च बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहील’n    पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी १५ व १६ जून रोजी चीनच्या सैन्याशी लढताना हुतात्मा झालेल्या २० भारतीय जवानांना लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांंनी मंगळवारी आदरांजली अर्पण केली. n    जनरल नरवणे म्हणाले,“चीनच्या अभूतपूर्व अशा आक्रमणात जवानांनी अतिशय कठीण अशा उंच भागात लढून केलेले सर्वोच्च बलिदान देशाच्या कायम स्मरणात कोरलेले राहील.” जवळपास पाच दशकांनंतर चीनशी प्रथमच झालेला हा अत्यंत हिंसक असा संघर्ष होता.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख