शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण?

By admin | Updated: August 3, 2016 06:10 IST

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ज्या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत, त्यात आरोग्यमंत्री नितीन पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विजय रूपानी, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि विधानसभाध्यक्ष गणपत वसावा यांच्या नावांचा समावेश आहे. दावेदार नितीन पटेल यांना याबाबत विचारता ते म्हणाले की, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारू असे रूपानी यांनी सांगितले. नव्या मुख्यमंत्र्यांना २०१७च्या निवडणुकीपर्यंत एक वर्षाहून अधिक कार्यकाळ मिळणार आहे. राज्यात मोदी यांच्या कार्यकाळानंतर प्रथमच पक्षाला विरोधी पक्षांकडून कडवे आव्हान मिळत आहे. डिसेंबर २०१५मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ग्रामीण भागात काँग्रेसला चांगले यश मिळाले, तर पटेल आंदोलनाचाही आनंदीबेन यांना सामना करावा लागला. उना येथील घटनेनंतर दलितांचे आंदोलनही सुरू झाले. पक्षाच्या प्रतिमेला त्यामुळे तडा गेला. आनंदीबेन यांची मुलगी अनार पटेलविरुद्ध काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप केले. या सर्व प्रकारांमुळे आनंदीबेन यांच्या अडचणीत वाढ होत गेली. (वृत्तसंस्था)>मीठ चोळू नकाकाँगे्रसचे गुजरात विभागाचे महासचिव गुरुदास कामत यांनी म्हटले आहे की, जर आनंदीबेन यांना कोणत्याही राज्याचे राज्यपाल केले गेले किंवा केंद्रात कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेतले, तर दलित आणि पाटीदार समुदायाच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखे होईल. >आनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवलेआनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवून भाजपा स्वत:ला राज्यात वाचवू शकत नाही. कारण, गुजरातची जी हानी, दुरवस्था झाली आहे त्यासाठी नरेंद्र मोदी यांचे १३ वर्षांतील सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आनंदीबेन पटेल यांनी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी याबाबत टिष्ट्वट केले आहे. ते म्हणाले की, गुजरातच्या दुरवस्थेसाठी आनंदीबेन यांचे दोन वर्षांचे सरकार नव्हे, तर मोदींचे १३ वर्षांचे सरकार जबाबदार आहे.