शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण?

By admin | Updated: August 3, 2016 06:10 IST

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ज्या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत, त्यात आरोग्यमंत्री नितीन पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विजय रूपानी, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि विधानसभाध्यक्ष गणपत वसावा यांच्या नावांचा समावेश आहे. दावेदार नितीन पटेल यांना याबाबत विचारता ते म्हणाले की, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारू असे रूपानी यांनी सांगितले. नव्या मुख्यमंत्र्यांना २०१७च्या निवडणुकीपर्यंत एक वर्षाहून अधिक कार्यकाळ मिळणार आहे. राज्यात मोदी यांच्या कार्यकाळानंतर प्रथमच पक्षाला विरोधी पक्षांकडून कडवे आव्हान मिळत आहे. डिसेंबर २०१५मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ग्रामीण भागात काँग्रेसला चांगले यश मिळाले, तर पटेल आंदोलनाचाही आनंदीबेन यांना सामना करावा लागला. उना येथील घटनेनंतर दलितांचे आंदोलनही सुरू झाले. पक्षाच्या प्रतिमेला त्यामुळे तडा गेला. आनंदीबेन यांची मुलगी अनार पटेलविरुद्ध काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप केले. या सर्व प्रकारांमुळे आनंदीबेन यांच्या अडचणीत वाढ होत गेली. (वृत्तसंस्था)>मीठ चोळू नकाकाँगे्रसचे गुजरात विभागाचे महासचिव गुरुदास कामत यांनी म्हटले आहे की, जर आनंदीबेन यांना कोणत्याही राज्याचे राज्यपाल केले गेले किंवा केंद्रात कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेतले, तर दलित आणि पाटीदार समुदायाच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखे होईल. >आनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवलेआनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवून भाजपा स्वत:ला राज्यात वाचवू शकत नाही. कारण, गुजरातची जी हानी, दुरवस्था झाली आहे त्यासाठी नरेंद्र मोदी यांचे १३ वर्षांतील सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आनंदीबेन पटेल यांनी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी याबाबत टिष्ट्वट केले आहे. ते म्हणाले की, गुजरातच्या दुरवस्थेसाठी आनंदीबेन यांचे दोन वर्षांचे सरकार नव्हे, तर मोदींचे १३ वर्षांचे सरकार जबाबदार आहे.