शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण?

By admin | Updated: August 3, 2016 06:10 IST

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ज्या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत, त्यात आरोग्यमंत्री नितीन पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विजय रूपानी, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि विधानसभाध्यक्ष गणपत वसावा यांच्या नावांचा समावेश आहे. दावेदार नितीन पटेल यांना याबाबत विचारता ते म्हणाले की, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारू असे रूपानी यांनी सांगितले. नव्या मुख्यमंत्र्यांना २०१७च्या निवडणुकीपर्यंत एक वर्षाहून अधिक कार्यकाळ मिळणार आहे. राज्यात मोदी यांच्या कार्यकाळानंतर प्रथमच पक्षाला विरोधी पक्षांकडून कडवे आव्हान मिळत आहे. डिसेंबर २०१५मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ग्रामीण भागात काँग्रेसला चांगले यश मिळाले, तर पटेल आंदोलनाचाही आनंदीबेन यांना सामना करावा लागला. उना येथील घटनेनंतर दलितांचे आंदोलनही सुरू झाले. पक्षाच्या प्रतिमेला त्यामुळे तडा गेला. आनंदीबेन यांची मुलगी अनार पटेलविरुद्ध काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप केले. या सर्व प्रकारांमुळे आनंदीबेन यांच्या अडचणीत वाढ होत गेली. (वृत्तसंस्था)>मीठ चोळू नकाकाँगे्रसचे गुजरात विभागाचे महासचिव गुरुदास कामत यांनी म्हटले आहे की, जर आनंदीबेन यांना कोणत्याही राज्याचे राज्यपाल केले गेले किंवा केंद्रात कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेतले, तर दलित आणि पाटीदार समुदायाच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखे होईल. >आनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवलेआनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवून भाजपा स्वत:ला राज्यात वाचवू शकत नाही. कारण, गुजरातची जी हानी, दुरवस्था झाली आहे त्यासाठी नरेंद्र मोदी यांचे १३ वर्षांतील सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आनंदीबेन पटेल यांनी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी याबाबत टिष्ट्वट केले आहे. ते म्हणाले की, गुजरातच्या दुरवस्थेसाठी आनंदीबेन यांचे दोन वर्षांचे सरकार नव्हे, तर मोदींचे १३ वर्षांचे सरकार जबाबदार आहे.