शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

तो फुटलेला उमेदवार कोण?

By admin | Updated: November 14, 2016 02:31 IST

खोर ग्रामपंचायत : गावभर चर्चेला आले उधाण

खोर ग्रामपंचायत : गावभर चर्चेला आले उधाण
खोर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. मात्र एक उमेदवाराच्या फुटीमुळे मोठी राजकीय उलथापालथ पाहावयास मिळाल्याने खोर गावामध्येच नव्हे तर संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये हा फुटलेला उमेदवार कोण? असा प्रश्न उभा राहिला गेला आहे.
यापूर्वी सन २०१४ ला झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार थोरात गटाचे सहा तर आमदार राहुल कुल गटाचे पाच उमेदवार विजय झाले होते. त्या वेळी कुल गटाचे उमेदवार पांडुरंग डोंबे यांचा एका मताने पराभव झाला होता. एका मतामुळे ही ग्रामपंचायत माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाच्या ताब्यात होती. पहिल्या वर्षी थोरात गटाचे रामचंद्र चौधरी हे सरपंचपदी विराजमान झाले होते. ठरलेल्या निर्धारित कालावधीमुळे रामचंद्र चौधरी यांनी आपल्या सरपंचपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी तर कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी व शिवाजी हिरामण पिसे यांनी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत शिवाजी हिरामण पिसे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी व कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी यांचे दोघांचे सरपंचपदासाठी अर्ज राहिले.
या वेळी झालेल्या गुप्त मतदान पद्धतीने मतदानात सरपंचपदी कुल गटाचे सुभाष विठ्ठल चौधरी यांना अटीतटीच्या लढतीत ६ मते मिळाली, तर थोरात गटाचे मारुती धोंडीबा चौधरी यांना ५ मते मिळाली. या निवडणुकीत मारुती चौधरी यांचा कुल गटाच्या सुभाष विठ्ठल चौधरी यांनी १ मताने पराभव करीत अनपेक्षित विजय संपादन करीत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला. या विजयामुळे थोरात गटाचा एक सदस्य फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फुटलेला सदस्य कोण याची खमंग चर्चा सध्या तालुकाभर सुरू आहे.
खोर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले होते. मात्र, त्यांनीदेखील भर सभेत आपल्या भाषणातून सांगितले होते की, ही थोरात गटाची सत्ता ही काठावरची आहे. सरपंच जरा जपून बरं का? असा मिस्कील शब्दांत टोला लगावला होता. मात्र, सध्याची स्थिती तशीच होऊन बसली आहे. माजी सरपंच रामचंद्र चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आमदार राहुल कुल गटाने उमेदवार फोडण्याबाबतचे सर्जिकल स्ट्राइक चालू केले. उमेदवार फोडून सत्ता उलथापालथ होऊन तब्बल चार वर्षे खोर ग्रामपंचायतीची सत्ता ही कुल गटाकडे आली आहे. मात्र, फुटलेल्या उमेदवाराची चर्चा विसरायला गाव काही तयार नाही, अशी गत सध्या होऊन बसली आहे.

चौकट ..... माजी आमदार रमेश थोरात यांच्या आग्रहाखातर खोर हे गाव नुकतेच राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी आदर्श सांसद ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे. आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत कुल गटाकडे गेल्याने राष्ट्रवादीपुढे नामुष्की ओढवली आहे.