शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

सलाउद्दिनला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला?

By admin | Updated: August 9, 2016 03:19 IST

हिज्बुलचा अतिरेकी सय्यद सलाउद्दिन याला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केला

नवी दिल्ली : हिज्बुलचा अतिरेकी सय्यद सलाउद्दिन याला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केला. भारतावर अणुहल्ल्याची धमकी सलाउद्दिन याने दिली असून, त्यासंदर्भात नायडू यांनी बोलत होते. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, कोण हा सलाउद्दिन? काश्मीरवर बोलण्याचा अधिकार त्याला कोणी दिला आहे? धमकीने काहीही होणार नाही. तथापि, सलाउद्दिन आणि २६/११ हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानलाही नायडू यांनी यावेळी फटकारले. सलाउद्दिनचे वक्तव्य म्हणजे प्रसिद्धीचा खटाटोप आहे. अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्ताननेही यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या लढाईला समर्थन देण्यासाठी पाकिस्तान नैतिक, राजकीय आणि घटनात्मकदृष्ट्या बांधील आहे. जर या लढ्याला पाकिस्तानने समर्थन दिले, तर दोन देशांतील अणुयुद्ध अटळ आहे, असे वक्तव्य सलाउद्दिन याने कराचीत सोमवारी केले. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरमधील हिंसाचाराकडे लक्ष दिले नाही, तर तेथील लोकच हा प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवतील. प्रसंगी नियंत्रण रेषेचेही उल्लंघन करावे लागेल, असेही सलाउद्दिन म्हणाला. पाकिस्तानातील अतिरेकी वा राजकीय नेत्याकडून भारताच्या अंतर्गत प्रश्नावर विशेषत: काश्मीरवर दीर्घ काळानंतर अशा प्रकारचे भाष्य झाले आहे. काश्मिरात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा अतिरेकी बुरहान वणी हा ८ जुलै रोजी मारला गेल्यापासून तिथे मोठा हिंसाचार उसळला आहे. यात आतापर्यंत ६० जण मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही बुरहाण वणीच्या मृत्यूने आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते. शरीफ यांनी त्याचे जर्णन ‘शहीद’म्हणूनही केले होते.