शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

सलाउद्दिनला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला?

By admin | Updated: August 9, 2016 03:19 IST

हिज्बुलचा अतिरेकी सय्यद सलाउद्दिन याला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केला

नवी दिल्ली : हिज्बुलचा अतिरेकी सय्यद सलाउद्दिन याला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केला. भारतावर अणुहल्ल्याची धमकी सलाउद्दिन याने दिली असून, त्यासंदर्भात नायडू यांनी बोलत होते. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, कोण हा सलाउद्दिन? काश्मीरवर बोलण्याचा अधिकार त्याला कोणी दिला आहे? धमकीने काहीही होणार नाही. तथापि, सलाउद्दिन आणि २६/११ हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानलाही नायडू यांनी यावेळी फटकारले. सलाउद्दिनचे वक्तव्य म्हणजे प्रसिद्धीचा खटाटोप आहे. अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्ताननेही यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या लढाईला समर्थन देण्यासाठी पाकिस्तान नैतिक, राजकीय आणि घटनात्मकदृष्ट्या बांधील आहे. जर या लढ्याला पाकिस्तानने समर्थन दिले, तर दोन देशांतील अणुयुद्ध अटळ आहे, असे वक्तव्य सलाउद्दिन याने कराचीत सोमवारी केले. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरमधील हिंसाचाराकडे लक्ष दिले नाही, तर तेथील लोकच हा प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवतील. प्रसंगी नियंत्रण रेषेचेही उल्लंघन करावे लागेल, असेही सलाउद्दिन म्हणाला. पाकिस्तानातील अतिरेकी वा राजकीय नेत्याकडून भारताच्या अंतर्गत प्रश्नावर विशेषत: काश्मीरवर दीर्घ काळानंतर अशा प्रकारचे भाष्य झाले आहे. काश्मिरात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा अतिरेकी बुरहान वणी हा ८ जुलै रोजी मारला गेल्यापासून तिथे मोठा हिंसाचार उसळला आहे. यात आतापर्यंत ६० जण मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही बुरहाण वणीच्या मृत्यूने आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते. शरीफ यांनी त्याचे जर्णन ‘शहीद’म्हणूनही केले होते.