शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सलाउद्दिनला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला?

By admin | Updated: August 9, 2016 03:19 IST

हिज्बुलचा अतिरेकी सय्यद सलाउद्दिन याला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केला

नवी दिल्ली : हिज्बुलचा अतिरेकी सय्यद सलाउद्दिन याला काश्मीरवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केला. भारतावर अणुहल्ल्याची धमकी सलाउद्दिन याने दिली असून, त्यासंदर्भात नायडू यांनी बोलत होते. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, कोण हा सलाउद्दिन? काश्मीरवर बोलण्याचा अधिकार त्याला कोणी दिला आहे? धमकीने काहीही होणार नाही. तथापि, सलाउद्दिन आणि २६/११ हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानलाही नायडू यांनी यावेळी फटकारले. सलाउद्दिनचे वक्तव्य म्हणजे प्रसिद्धीचा खटाटोप आहे. अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्ताननेही यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या लढाईला समर्थन देण्यासाठी पाकिस्तान नैतिक, राजकीय आणि घटनात्मकदृष्ट्या बांधील आहे. जर या लढ्याला पाकिस्तानने समर्थन दिले, तर दोन देशांतील अणुयुद्ध अटळ आहे, असे वक्तव्य सलाउद्दिन याने कराचीत सोमवारी केले. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरमधील हिंसाचाराकडे लक्ष दिले नाही, तर तेथील लोकच हा प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवतील. प्रसंगी नियंत्रण रेषेचेही उल्लंघन करावे लागेल, असेही सलाउद्दिन म्हणाला. पाकिस्तानातील अतिरेकी वा राजकीय नेत्याकडून भारताच्या अंतर्गत प्रश्नावर विशेषत: काश्मीरवर दीर्घ काळानंतर अशा प्रकारचे भाष्य झाले आहे. काश्मिरात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा अतिरेकी बुरहान वणी हा ८ जुलै रोजी मारला गेल्यापासून तिथे मोठा हिंसाचार उसळला आहे. यात आतापर्यंत ६० जण मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही बुरहाण वणीच्या मृत्यूने आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते. शरीफ यांनी त्याचे जर्णन ‘शहीद’म्हणूनही केले होते.