शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही - प्रणव मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 20:59 IST

महात्मा गांधी यांची स्वप्ने साकारायची असतील तर आपल्याला गरिबाहून गरिब व्यक्तीला सशक्त बनविले पाहिजे. दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 -  महात्मा गांधी यांची स्वप्ने साकारायची असतील तर आपल्याला गरिबाहून गरिब व्यक्तीला सशक्त बनविले पाहिजे. दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोहोचतील याची काळजी घ्यायला हवी, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या शेवटच्या सांगितले. यावेळी त्यांनी आगामी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे आभार मानले. 
समाज हिंसामुक्त व्हायला हवा, केवळ अहिंसक समाजच सर्वांची सुरक्षा आणि लोकशाही सुनिश्चित करू शकतो. अहिंसक समाजच भारताचे हित साध्य करु शकतो. देशातील पर्यावरणाची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे. भारताची विविधता टिकवून ठेवा. संस्कृती, विश्वास आणि भाषा देशाची एक खास ओळख बनविते. भारताची आत्मा विविधता आणि सहिष्णूतामध्ये आहे. दुस-यांच्या विचारांना कोणी नाकारु शकत नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.
मी 2012 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला म्हणालो होतो की, लोकशाही कोणत्याही पदामध्ये नसते, आपण सर्व बरोबर असून देशाच्या विकासाठी आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. ज्यावेळी मी राष्ट्रपतीपद स्विकारले तेव्हा जनतेच्या सुरक्षेचे वचन दिले होते. गेली पाच वर्ष त्यासाठी मी प्रत्येकवेळी जबाबदार राहिलो. नागरिकांनी दिलेल्या सहयोगामुळे मी त्यांचा नेहमी ऋणी राहील, असेही यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. 
दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या "सिलेक्टेड स्पीचेस" या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आहे.