शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

टाटा समूहात बॉस कोण ? कर्मचा-यांचा गोंधळ

By admin | Updated: November 3, 2016 11:55 IST

टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही. यापूर्वी ९० च्या दशकात रुसी मोदी यांनी टाटा स्टीलच्या बोर्डावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच अजित केरकर यांनी ताज ग्रुपच्या हॉटेल्सवर वर्चस्व मिळवण्यासाठी टाटा समूहाला आव्हान दिले होते. 
 
रतन टाटा यांची त्यावेळी टाटा सन्सच्या चेअरमनपदावर निवड झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. पण त्यावेळचा संघर्ष आणि आता सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतरचा संघर्ष खूप वेगळा आहे. मोदी आणि केरकर यांच्याकडे जे अस्त्र नव्हते ते मिस्त्री यांच्याकडे आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाचा टाटा सन्समध्ये १८.५ टक्के हिस्सा आहे.  
 
मोदी आणि केरकर स्टील आणि हॉटेलपुरता मर्यादीत होते पण सायरस मिस्त्री टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स या समूहातील बडया कंपन्यांच्या चेअरमनपदावर आहेत तसेच अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. रतन टाटा यांनी अलीकडेच समूहातील बडया कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. त्यावेळी सायरस मिस्त्री समूहातील कंपन्यांच्या बोर्डावर असल्याकडे त्यांनी टाटांचे लक्ष वेधले. त्यावर आपण अजून मिस्त्रींबरोबर याबद्दल चर्चा केली नसल्याचे टाटांनी उत्तर दिले. 
 
बहुमत असल्यामुळे सायरस मिस्त्री यांना हटवून त्यांच्या जागी नव्या चेअरमनची निवड करणे सोपे आहे पण समूहातील सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळावरुन त्यांना हटवणे शक्य नाही कारण त्याला शेअरहोल्डरची परवानगी लागेल.