शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पोलिसांचा धाक गेला कुठे?

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

हायकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंता

हायकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंता

नागपूर : समाजात उद्दामपणाची पातळी वाढत असल्याने व पोलिसांचा धाक हळूहळू कमी होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यात काही आरोपींनी गोंधळ घालून एका जणाला मारहाण केली होती. पोलिसांपुढेच असा प्रकार घडल्यामुळे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी व्यथित होऊन एकंदरित परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणातील आरोपींनी फिर्यादीसोबत तडजोड करून एफआयआर रद्द करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कायद्यातील तरतुदीनुसार अर्ज मंजूर केला पण, घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपी व फिर्यादीला २४ फेब्रुवारीपूर्वी वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालयात ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. ही रक्कम न भरल्यास पोलिसांनी आरोपींना अटक करून त्याची माहिती न्यायालयाला द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय भविष्यात अशाप्रकारचे उद्दाम वर्तन करणार नाही असे प्रतिज्ञापत्र व हमीपत्र दोन आठवड्यांत न्यायालयात सादर करण्यास आरोपींना सांगण्यात आले आहे. आरोपींना याचिकेचा खर्च म्हणून ५ हजार रुपये भरण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
आरोपींना धडा मिळावा यासाठी अशाप्रकारचे आदेश देणे आवश्यक आहे. परंतु, यानंतरही आरोपी भविष्यात गोंधळ घालणार नाही याची आम्हाला खात्री नसल्याचे मत न्यायालयाने एकूण चित्र लक्षात घेता व्यक्त केले आहे.
--------------------
काय आहे प्रकरण
८ नोव्हेंबर २०१४ रोजी अरुण मगर व इतर चौघांनी उमेश सरनाईक याला वाईन बारमध्ये मारहाण केली. यामुळे उमेश पळून पोलीस ठाण्यात आला. आरोपी लोखंडी पाईप घेऊन मोटरसायकलने पोलीस ठाण्यात पोहोचले व पोलिसांपुढे उमेशला मारहाण केली. यामुळे टेबलवरील काच फुटला. यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १४३, १४८, १४९ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला.