शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

कुठे आहे असहिष्णूता? - अरूण जेटलींचा प्रतिप्रश्न

By admin | Updated: November 3, 2015 14:59 IST

साहित्यिक सरकारी पुरस्कार परत करत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशामध्ये शांततेने सहचर्य सुरू असून असहिष्णूता कुठे आहे असा प्रतिसवाल केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - देशामध्ये असहिष्णूता वाढत असल्याचा आरोप विरोधकांकडून उच्चारवाने होत असताना आणि साहित्यिक सरकारी पुरस्कार परत करत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशामध्ये शांततेने सहचर्य सुरू असून असहिष्णूता कुठे आहे असा प्रतिसवाल केला आहे.
राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी राजकीय लढाई लढली पाहिजे आणि प्रत्येक घटनेचा संबंध केंद्र सरकारशी जोडता कामा नये असे मत व्यक्त केले आहे.
जगातली सगळ्यात चांगली जितीजागती लोकशाही भारतात आहे, प्रत्येकाला मुक्त संवादाचा व हवं तसं जीवन जगण्याचा अधिकार आहे असं असताना असहिष्णूता कुठे आहे असा सवाल जेटली यांनी केला आहे.
देशामधलं वातावरण चांगलं रहावं अशी आपली अपेक्षा असून केवळ भाषणबाजी करून असहिष्णूतेचं वातावरण रंगवता येणार नाही. केवळ म्हणायचं की असहिष्णूता आहे, कुठे आहे ती? जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना आपली मतं मांडली.
कर्नाटक व महाराष्ट्रातल्या ज्या घटनांचा दाखला दिला जात आहे त्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात घडल्याचे सांगताना ज्या कुणी हे गुन्हे केले आहेत, त्यांना कठोर शासन व्हायलात हवं असं मत व्यक्त केलं. मुख्य प्रवाहातल्या कोणीही अशा घटनांचं समर्थन केलेलं नसल्याचंही जेटली म्हणाले.
देशात सहिष्णूतेचे वातावरण असल्यामुळे व ते ते पुरस्कार त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनीच निवडलेल्या व्यक्तिंना दिलेले असल्यामुळे असे पुरस्कार परत करण्यात काही औचित्य नसल्याचे जेटलींनी सांगितले.