शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

कुठे आहे असहिष्णूता? - अरूण जेटलींचा प्रतिप्रश्न

By admin | Updated: November 3, 2015 14:59 IST

साहित्यिक सरकारी पुरस्कार परत करत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशामध्ये शांततेने सहचर्य सुरू असून असहिष्णूता कुठे आहे असा प्रतिसवाल केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - देशामध्ये असहिष्णूता वाढत असल्याचा आरोप विरोधकांकडून उच्चारवाने होत असताना आणि साहित्यिक सरकारी पुरस्कार परत करत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशामध्ये शांततेने सहचर्य सुरू असून असहिष्णूता कुठे आहे असा प्रतिसवाल केला आहे.
राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी राजकीय लढाई लढली पाहिजे आणि प्रत्येक घटनेचा संबंध केंद्र सरकारशी जोडता कामा नये असे मत व्यक्त केले आहे.
जगातली सगळ्यात चांगली जितीजागती लोकशाही भारतात आहे, प्रत्येकाला मुक्त संवादाचा व हवं तसं जीवन जगण्याचा अधिकार आहे असं असताना असहिष्णूता कुठे आहे असा सवाल जेटली यांनी केला आहे.
देशामधलं वातावरण चांगलं रहावं अशी आपली अपेक्षा असून केवळ भाषणबाजी करून असहिष्णूतेचं वातावरण रंगवता येणार नाही. केवळ म्हणायचं की असहिष्णूता आहे, कुठे आहे ती? जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना आपली मतं मांडली.
कर्नाटक व महाराष्ट्रातल्या ज्या घटनांचा दाखला दिला जात आहे त्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काळात घडल्याचे सांगताना ज्या कुणी हे गुन्हे केले आहेत, त्यांना कठोर शासन व्हायलात हवं असं मत व्यक्त केलं. मुख्य प्रवाहातल्या कोणीही अशा घटनांचं समर्थन केलेलं नसल्याचंही जेटली म्हणाले.
देशात सहिष्णूतेचे वातावरण असल्यामुळे व ते ते पुरस्कार त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनीच निवडलेल्या व्यक्तिंना दिलेले असल्यामुळे असे पुरस्कार परत करण्यात काही औचित्य नसल्याचे जेटलींनी सांगितले.