शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

कुठे गेली मोदी सरकारची पारदर्शकता?

By admin | Updated: May 7, 2015 02:43 IST

मोदी सरकारची पारदर्शकता कुठे गेली? यापूर्वी केलेल्या पारदर्शकतेच्या बाता पाहता ही तर कोलांटउडीच ठरते, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारला रोखठोक जाब विचारला.

सोनिया गांधी यांनी विचारला जाब : सीआयसी, सीव्हीसीची पदे वर्षभर रिक्तनवी दिल्ली : मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) ही पदे जवळ जवळ वर्षभरापासून रिक्त ठेवणाऱ्या मोदी सरकारची पारदर्शकता कुठे गेली? यापूर्वी केलेल्या पारदर्शकतेच्या बाता पाहता ही तर कोलांटउडीच (यू-टर्न) ठरते, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारला रोखठोक जाब विचारला. मात्र प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत सरकारने सोनियांचे आरोप फेटाळून लावले. सरकारने हेतुपुरस्सर ही पदे रिक्त ठेवली असून उत्तरदायित्वापासून बचाव करण्याचा त्यामागे उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या, की सीव्हीसी आणि सीआयसीची पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप लोकपालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी पारदर्शकता आणि सुशासनाचे आश्वासन दिले होते, ते कुठे गेले असा सवाल करीत सोनियांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली असता, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ती फेटाळली़ मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर मुद्दा उपस्थित करण्याला परवानगी दिली.

माहिती अधिकार निष्प्रभ करण्याचा डाव माहिती अधिकार कायद्यानुसार येणारे उत्तरदायित्व टाळण्यासाठी सरकारने माहिती अधिकार कायदा (आरटीआय) निष्प्रभ करण्याचा डाव रचल्याचा आरोपही त्यांनी केला. आरटीआय कायदा ऐतिहासिक असून, त्यामुळेच लोकांना सरकारला जाब विचारण्याचा अधिकार मिळाला आहे. आरटीआयअंतर्गत ३९ हजार प्रकरणे निलंबित असल्याची कबुली सरकारने दिली आहे. माहिती देण्यास विलंब म्हणजे माहिती देण्यास नकारच ठरतो. ही स्थिती कदापि खपवून घेतली जाणार नाही. दोषींचा बचाव केला जाऊ नये, असा इशाराही सोनिया यांनी दिला. ... हा तर स्वायत्ततेवर हल्ला > मुख्य माहिती आयुक्तांचे (सीआयसी) आर्थिक अधिकार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिवांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. हा सीआयसीच्या स्वायत्ततेवर घाला आहे. > सरकारला जबाबदारी झटकायची आहे. सरकारला एका पाठोपाठ वटुहुकूम आणण्याची घाई झाली असून, व्हिसल ब्लोअर कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असतानाही वटहुकूम जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकते, असेही त्या म्हणाल्या.