शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेली मोदी सरकारची पारदर्शकता?

By admin | Updated: May 7, 2015 02:43 IST

मोदी सरकारची पारदर्शकता कुठे गेली? यापूर्वी केलेल्या पारदर्शकतेच्या बाता पाहता ही तर कोलांटउडीच ठरते, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारला रोखठोक जाब विचारला.

सोनिया गांधी यांनी विचारला जाब : सीआयसी, सीव्हीसीची पदे वर्षभर रिक्तनवी दिल्ली : मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) ही पदे जवळ जवळ वर्षभरापासून रिक्त ठेवणाऱ्या मोदी सरकारची पारदर्शकता कुठे गेली? यापूर्वी केलेल्या पारदर्शकतेच्या बाता पाहता ही तर कोलांटउडीच (यू-टर्न) ठरते, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारला रोखठोक जाब विचारला. मात्र प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत सरकारने सोनियांचे आरोप फेटाळून लावले. सरकारने हेतुपुरस्सर ही पदे रिक्त ठेवली असून उत्तरदायित्वापासून बचाव करण्याचा त्यामागे उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या, की सीव्हीसी आणि सीआयसीची पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप लोकपालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी पारदर्शकता आणि सुशासनाचे आश्वासन दिले होते, ते कुठे गेले असा सवाल करीत सोनियांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली असता, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ती फेटाळली़ मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर मुद्दा उपस्थित करण्याला परवानगी दिली.

माहिती अधिकार निष्प्रभ करण्याचा डाव माहिती अधिकार कायद्यानुसार येणारे उत्तरदायित्व टाळण्यासाठी सरकारने माहिती अधिकार कायदा (आरटीआय) निष्प्रभ करण्याचा डाव रचल्याचा आरोपही त्यांनी केला. आरटीआय कायदा ऐतिहासिक असून, त्यामुळेच लोकांना सरकारला जाब विचारण्याचा अधिकार मिळाला आहे. आरटीआयअंतर्गत ३९ हजार प्रकरणे निलंबित असल्याची कबुली सरकारने दिली आहे. माहिती देण्यास विलंब म्हणजे माहिती देण्यास नकारच ठरतो. ही स्थिती कदापि खपवून घेतली जाणार नाही. दोषींचा बचाव केला जाऊ नये, असा इशाराही सोनिया यांनी दिला. ... हा तर स्वायत्ततेवर हल्ला > मुख्य माहिती आयुक्तांचे (सीआयसी) आर्थिक अधिकार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिवांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. हा सीआयसीच्या स्वायत्ततेवर घाला आहे. > सरकारला जबाबदारी झटकायची आहे. सरकारला एका पाठोपाठ वटुहुकूम आणण्याची घाई झाली असून, व्हिसल ब्लोअर कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असतानाही वटहुकूम जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकते, असेही त्या म्हणाल्या.