शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

न खाउंगा न खाने दुंगा म्हणणारे मोदी कुठे गेले - राहूल गांधींचा हल्लाबोल

By admin | Updated: July 23, 2015 12:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्यावेळी न खाऊंगा न खाने दुंगा असे सांगत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला परंतु त्यांनी भ्रमनिरास केला असल्याचा आरोप राहूल गांधींनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्यावेळी न खाऊंगा न खाने दुंगा असे सांगत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला परंतु त्यांनी आपलाच नाही तर जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप करत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी गुरुवारी भाजपावर हल्ला चढवला. ललित मोदींसारख्या भगोड्याला सहाय्य करत सुषमा स्वराज यांनी फौजदारी गुन्हा केल्याचे गांधी म्हणाले तसेच या सगळ्यावर नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाही असा सवाल गांधींनी उपस्थित केला आहे.
सुषमा स्वराज प्रकरण असेल, वसुंधरा राजे, व्यापम घोटाळा, छत्तीसगड अशा अनेक प्रकरणांवर मोदी गप्प का आहेत असे सांगतानाच मोदी शांत राहिले तर मलाच फायदा होत आहे पण जनतेला उत्तरं हवी आहेत असंही त्यांनी सांगितले. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभा दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मात्र काँग्रेसने आधी चर्चा करावी त्याआधी कुणाचाही राजीनामा घेण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. राहूल गांधींनी स्वराज यांच्या राजीनाम्याखेरीज चर्चा नाही अशी भूमिका घेतली तर चर्चेआधी राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे या अधिवेशनाचे काय होणार हा प्रश्नच उपस्थित झाला आहे.
तसेच भाजपाने काँग्रेसशासित सात राज्यांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली असून काँग्रेस त्या त्या राज्यांमधल्या नेत्यांचे राजीनीमे का घेत नाही असा सवाल विचारला आहे. काँग्रेसने या मुद्यांवर पाठिंबा मिळावा म्हणून अन्य पक्षांशी बोलणी सुरू ठेवली आहेत.