शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

न खाउंगा न खाने दुंगा म्हणणारे मोदी कुठे गेले - राहूल गांधींचा हल्लाबोल

By admin | Updated: July 23, 2015 12:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्यावेळी न खाऊंगा न खाने दुंगा असे सांगत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला परंतु त्यांनी भ्रमनिरास केला असल्याचा आरोप राहूल गांधींनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्यावेळी न खाऊंगा न खाने दुंगा असे सांगत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला परंतु त्यांनी आपलाच नाही तर जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप करत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी गुरुवारी भाजपावर हल्ला चढवला. ललित मोदींसारख्या भगोड्याला सहाय्य करत सुषमा स्वराज यांनी फौजदारी गुन्हा केल्याचे गांधी म्हणाले तसेच या सगळ्यावर नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाही असा सवाल गांधींनी उपस्थित केला आहे.
सुषमा स्वराज प्रकरण असेल, वसुंधरा राजे, व्यापम घोटाळा, छत्तीसगड अशा अनेक प्रकरणांवर मोदी गप्प का आहेत असे सांगतानाच मोदी शांत राहिले तर मलाच फायदा होत आहे पण जनतेला उत्तरं हवी आहेत असंही त्यांनी सांगितले. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभा दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मात्र काँग्रेसने आधी चर्चा करावी त्याआधी कुणाचाही राजीनामा घेण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. राहूल गांधींनी स्वराज यांच्या राजीनाम्याखेरीज चर्चा नाही अशी भूमिका घेतली तर चर्चेआधी राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे या अधिवेशनाचे काय होणार हा प्रश्नच उपस्थित झाला आहे.
तसेच भाजपाने काँग्रेसशासित सात राज्यांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली असून काँग्रेस त्या त्या राज्यांमधल्या नेत्यांचे राजीनीमे का घेत नाही असा सवाल विचारला आहे. काँग्रेसने या मुद्यांवर पाठिंबा मिळावा म्हणून अन्य पक्षांशी बोलणी सुरू ठेवली आहेत.