शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

न खाउंगा न खाने दुंगा म्हणणारे मोदी कुठे गेले - राहूल गांधींचा हल्लाबोल

By admin | Updated: July 23, 2015 12:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्यावेळी न खाऊंगा न खाने दुंगा असे सांगत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला परंतु त्यांनी भ्रमनिरास केला असल्याचा आरोप राहूल गांधींनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांच्यावेळी न खाऊंगा न खाने दुंगा असे सांगत लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला परंतु त्यांनी आपलाच नाही तर जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप करत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी गुरुवारी भाजपावर हल्ला चढवला. ललित मोदींसारख्या भगोड्याला सहाय्य करत सुषमा स्वराज यांनी फौजदारी गुन्हा केल्याचे गांधी म्हणाले तसेच या सगळ्यावर नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाही असा सवाल गांधींनी उपस्थित केला आहे.
सुषमा स्वराज प्रकरण असेल, वसुंधरा राजे, व्यापम घोटाळा, छत्तीसगड अशा अनेक प्रकरणांवर मोदी गप्प का आहेत असे सांगतानाच मोदी शांत राहिले तर मलाच फायदा होत आहे पण जनतेला उत्तरं हवी आहेत असंही त्यांनी सांगितले. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभा दिवसभरासाठी तर राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मात्र काँग्रेसने आधी चर्चा करावी त्याआधी कुणाचाही राजीनामा घेण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. राहूल गांधींनी स्वराज यांच्या राजीनाम्याखेरीज चर्चा नाही अशी भूमिका घेतली तर चर्चेआधी राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे या अधिवेशनाचे काय होणार हा प्रश्नच उपस्थित झाला आहे.
तसेच भाजपाने काँग्रेसशासित सात राज्यांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली असून काँग्रेस त्या त्या राज्यांमधल्या नेत्यांचे राजीनीमे का घेत नाही असा सवाल विचारला आहे. काँग्रेसने या मुद्यांवर पाठिंबा मिळावा म्हणून अन्य पक्षांशी बोलणी सुरू ठेवली आहेत.